Sushma Andhare post : आज २९ अॅागस्ट या दिवशी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा समाजातील आंदोलक बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे आता आझाद मैदानावर लोकांची गर्दी वाढायला सुरूवात झाली आहे. आंदोलनस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामुळे आता मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीला घेऊन विरोधकांकडून सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता या मुद्यावरून शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स पोस्टवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांना लक्ष्य केलं असून, तीन प्रश्न विचारले आहेत. सुषमा अंधारेंची ही पोस्ट चर्चित आहे. त्यांनी या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या आहेत, फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ?ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का? असे काही प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत. ….तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे? फडणवीसाबद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे. अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच. पण हेच तत्त्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजे देसाई जेव्हा आईबहिणीवरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता, किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत आयझेड ची भाषा करत होत्या तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे? असा सवाल त्यांनी केला आहे. फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ? ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी… pic.twitter.com/z4JIn6wERw — SushmaTai Andhare (@andharesushama) August 28, 2025 “मराठा आंदोलनासाठी रिसोर्सेस कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते. मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल” असंही देवेंद्रजी म्हणाले. खरंतर आंदोलनासाठी येणारे लोक पायी, सायकलने, मोटरसायकलवर वडापमध्ये जमेल तसे येत आहेत आणि स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले? काय ते एकनाथ शिंदेंना इशारा देऊ पाहत आहेत का? असेलही कदाचित. आमचं मात्र एवढेच म्हणणं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावगाड्यांमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत ती वीण उसवण्याचं पाप फडणवीसांनी करू नये, असं देखील सुषमा अंधारेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा : MOTN Poll : पंतप्रधान मोदींच्या कामावर देशातील जनता समाधानी की नाराज? ; ताज्या सर्वेक्षणातून मोठा खुलासा…वाचा