नवी दिल्ली – युक्रेनच्या बाबतीत रशियाचे जे दोरण आहे, तेच धोरण भारताच्याबाबत चीन अवलंबत आहे, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (China’s approach to India same as Russia’s to Ukraine: Rahul Gandhi) सीमा बदलण्याच्या बाबत चीन भारताला धमकावत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. भारत आणि चीन दरम्यानचा सीमावाद कमकुवत अर्थकारण, कोणताही दृष्टीकोन नसलेला, द्वेष आणि राग असलेला देश,आणि भारताच्या सीमांवर असलेल्या चीनच्या धोक्यामुळे निर्माण झाला असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
रशियाला युक्रेनचे पाश्चात्य देशांबरोबर चांगले संबंध नको होते. जर पाश्चात्य देशांशी जवळीक केली, तर आक्रमण केले जाईल, असा इशारा रशियाने युक्रेनला दिला होता. चीनकडून हेच तत्व भारताबाबत लागू केले जाते आहे. चीनने लडाखमद्ये घुसण्याची तयारी केली आहे. अरुणाचल प्रदेशात घुसण्याची तयारी केली आहे. रशियासारखाच दृष्टीकोन चीनकडून ठेवला जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे, असे राहुल गांधी म्हणाले. अबिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांच्याबरोबरच्या वार्तालापादरम्यान राहुल गांधी यांनी ही मते मांडली. राहुल गांधी आणि कमल हासन यांच्यातील या वार्तालापाचा व्हिडीओ युट्युबवर शेअर करण्यात आला आहे.
युद्ध हा महत्वाचा मुद्दा नाही. मात्र अशा स्थितीवर पोहोचले पाहिजे, जेथे आपल्यावर आक्रमण केले जाऊ शकणार नाही. भारतात अंतर्गत समस्या आहेत. धोरणाबद्दल स्पष्टता नाही. दृष्टी नाही. सौहार्द नाही, हे चीनला माहिती आहे. त्यामुळेच चीन कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतो. हीच युक्रेनबाबतची समस्या होती, असेही राहुल गांधी म्हणाले.
पूर्वी संघर्ष केवळ सीमेवर करायला लागत होता. आता सगळीकडेच संघर्ष करायला लागतो आहे. संघर्,ाची परिबाषाच आता बदलून गेली आहे. 21 व्या शतकात देशात अंतर्गत एकसंघपणा आहे, ही एकमेव महत्वाची गोष्ट आहे. मात्र देशात सौहार्द असण्याची गरज आहे. लोकांनी एकमेकांशी भांडता कामा नये, शांतता असायला पाहिजे आणि देशाला एक दृ÷टी असायला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.
पाश्चात्य देश चीनशी स्पर्धा करू शकत नाहीत…
पाश्चात्य देश चीनशी स्पर्धा करू शकत नाहीत. मात्र भारत चीनशी स्पर्धा करू शकतो. आपल्याकडे मोठी लोकसंख्या आहे. चीनशी स्पर्दा करण्यायोग्य तरुणाई आपल्याकडे आहे. शिक्षणाचा मोठा पाया भारताकडे आहे. पाश्चात्यांनी त्यांची कामे आऊटसोर्स केली आहेत. आपले लोक कामात तज्ज्ञ आहेत. त्यामुळे चीनला आव्हान देण्यात अन्य कोणत्याही देशांपेक्षा भारताकडे अधिक क्षमता आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.