Chief Minister Yogi Adityanath । मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सहा आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसला कोंडीत पकडताना या निर्णयाचे स्वागत केले आहे. निकालानंतर, सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने देशाची माफी मागावी Chief Minister Yogi Adityanath । मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये, “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ही ‘सत्यमेव जयते’ची जिवंत घोषणा आहे. योगी आदित्यनाथ यांनी, “या निर्णयामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे भारतविरोधी, न्यायविरोधी आणि सनातनविरोधी चरित्र अधोरेखित होते, ज्याने ‘भगवा दहशतवाद’ ही खोटी संज्ञा निर्माण करून कोट्यवधी सनातन श्रद्धाळू, संत आणि राष्ट्रसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचा गुन्हा केला आहे.” असे म्हणत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”काँग्रेसने त्यांचे अक्षम्य दुष्कृत्य जाहीरपणे स्वीकारावे आणि देशाची माफी मागावी.अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. मालेगाव निकालात न्यायालयाने काय म्हटले? २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने म्हटले आहे की श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटके साठवल्याचा किंवा जमवल्याचा कोणताही पुरावा नाही. पंचनामा करताना, तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे कोणतेही रेखाचित्र तयार केले नाही. घटनास्थळावरून कोणतेही बोटांचे ठसे, डंप डेटा किंवा काहीही गोळा केले गेले नाही. नमुने दूषित होते, त्यामुळे अहवाल निर्णायक असू शकत नाहीत आणि विश्वसनीय नाहीत. ज्या स्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे त्या बाईकचा चेसिस नंबर स्पष्ट नव्हता. स्फोटापूर्वी तो साध्वी प्रज्ञा यांच्या ताब्यात होते हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. हिंदू दहशतवादाचे काँग्रेसचे षडयंत्र उद्धवस्त Chief Minister Yogi Adityanath । दुसरीकडे, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष सोडल्याबद्दल भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘हिंदू दहशतवादाचे काँग्रेसचे षड्यंत्र उध्वस्त झाले आहे. कोणत्याही आरोपीविरुद्ध पुरावे नव्हते. काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध लढणारे कर्नल पुरोहित यांच्यावर आरोप करण्यात आले. प्रज्ञा ठाकूरवर स्फोटात तिच्या मोटारसायकलचा वापर केल्याचा आरोप होता. तिला इतका छळण्यात आला की त्यानंतर तिला चालूही शकले नाही. हे काँग्रेसचे मतपेढीच्या राजकारणासाठी रचलेले शुद्ध षड्यंत्र होते. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो.