“छत्रपती शिवरायांचे किल्ले आमच्यासाठी मंदिरासारखे, सर्व अतिक्रमण हटवले जाईल”; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Devendra Fadanvis | छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढली जाणार असल्याची घोषणा केली आहे. शिवाजी महाराज यांचे किल्ले हे आमच्यासाठी मंदिरासारखे आहेत. त्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आज १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचा आत्मभिमानामागे शिवाजी महाराज यांची प्रेरणा आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्यदैवत आहे. महाराजांनी राजकारभार कसा चालवायचं हे सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युद्धे नव्हते तर एक उत्तम प्रशासक देखील होते. पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन आणि इतर व्यवस्थापनाचे जनक शिवाजी महाराज होते. त्यामुळे त्यांना आदर्श राजा, जाणता राजा म्हटलं जाते. आता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे राज्य सरकार असून या सरकारकडून शिवनेरी किल्ल्यासह इतर किल्ल्यांच्या संवर्धनाला निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Devendra Fadanvis |
किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवली जातील
पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले मंदिरांसारखे आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी अनेक कामे सुरू केली आहेत. एक टास्क फोर्स स्थापन केली असून त्यातून किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरची अतिक्रमणे हटवली जाणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले. Devendra Fadanvis |
उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार काय म्हणाले?
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांना महत्त्व आहे. पण तमाम शिवप्रेमींसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी शिवजन्माचा मुहूर्त सर्वात अनमोल आहे,” असे म्हंटले. “महाराष्ट्रातील गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने दौलत आहेत. हे गड किल्ले आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान आहेत. त्यामुळे या गडकिल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या आघाडी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. शिवजन्मभूमी शिवनेरीच्या जतन, संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. Devendra Fadanvis |
हेही वाचा:





