ॲलेक्झांडरपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज अनेक गुणांत श्रेष्ठ! अॅड. अनंत दारवटकर यांच्या तुलनात्मक ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन

पुणे: इतिहासकार अॅड. अनंत दारवटकर यांनी केलेल्या संशोधनानुसार, जगज्जेता म्हणून इतिहासात ओळखल्या जाणाऱ्या अॅलेक्झांडर द ग्रेटपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज अनेक गुणांत श्रेष्ठ ठरतात. ‘अॅलेक्स्झांडर दी ग्रेट – छत्रपति शिवाजी महाराज खंड १’ या तुलनात्मक संशोधित ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
रविवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी अॅवॉडमी ऑफ इलर्निंग, पर्वती, पुणे येथे या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित करण्यात आला. मा. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील (माजी हायकोर्ट न्यायाधीश) यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
न्यायमूर्ती कोळसे पाटील, आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी अॅड. दारवटकर यांच्या संशोधनाचे कौतुक केले. “हे संशोधन अतिशय अप्रतिम असून सर्व इतिहासकारांनी व संपूर्ण जगाने याची नोंद घेतली पाहिजे”, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज शिकलेल्या बहुजनांनी आपल्या देवतांचा खरा इतिहास पुराव्यासह लिहिणे अनिवार्य असल्याचेही ते म्हणाले. माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी ग्रंथातील तुलनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज हे अॅलेक्झांडरपेक्षा श्रेष्ठ कसे ठरतात, याचे दाखले मान्यवरांनी दिले:
* किल्ले आणि रणनीती: शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आणि कमी सैन्य असताना विजयासाठी किल्यांचा उपयोग केला, तर अॅलेक्झांडरने एकही किल्ला बांधला नाही.
* सैन्य आणि रयत: अॅलेक्झांडरला लढाईत त्याचे किती सैन्य मरते याची तमा नसायची, तर शिवाजी महाराज आपल्या सैनिकांच्या जीविताचा विचार अगोदर करत असल्याचे दिसून येते. अॅड. मिलिंद पवार यांनी स्पष्ट केले की, अॅलेक्झांडर केवळ सैनिकांचे नेतृत्व करीत होता, तर छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे नेतृत्व करीत होते.
* प्रशासन आणि आदर्श: माजी आयएएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी सांगितले की, शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने स्वयंप्रकाशित होते. त्यांची प्रशासन, तट रक्षक, कर प्रणाली, आरमार आणि युद्धनीती आजही आदर्श आहे.
* रणनिती आणि गुण: रणनितीचा विचार केल्यास शिवाजी महाराजांची रणनिती श्रेष्ठ ठरते. शूरवीरांच्या एकूण गुणांचा विचार करता महाराजांना १०० पैकी ६५% गुण, तर अॅलेक्झांडरला ३५% गुण दिले आहेत.
अॅड. अनंत दारवटकर यांनी गुणसंपन्न खरा सम्राट कोण याचे वेगळे संशोधन केले आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून वास्तववादी इतिहास जनतेसमोर येत असल्याचे मत इतिहासकारांनी व्यक्त केले. पुस्तकाचे समीक्षा प्राचार्य उद्धव कोळपे, माजी मुख्याध्यापक रामचंद्र शेलार सर आणि मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार सुरेश शिंदे यांनी केली.
कार्यक्रमाचे आयोजन अॅड. अनिल इंगले आणि सचिन भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध पवार यांनी केले. आभार प्रदर्शन रामनाथ गराडे यांनी केले.





