जिल्हा परिषद शाळेतील 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा ; काही विद्यार्थ्यांना उलट्या तर काही तापाने फणफणले

Chhatrapati Sambhajinagar । छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैठणमधील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील सुमारे 50 हून जास्त विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आलीय. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांवर उपचार सुरु, पालकांमध्ये नाराजी Chhatrapati Sambhajinagar ।
पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी बिस्किट वाटप करण्यात आले होते. हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. काही जणांना मळमळ, उलट्या होऊन सुमारे 50 हून अधिक विद्यार्थी तापाने फणफणल्याचं लक्षात आले. त्यानंतर लगेच या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. बिस्कीटातूनच विषबाधा झाली असल्याचे उघड झाले. काही विद्यार्थ्यांना सलाईन लावण्यात आले असून काहींवर उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले असले तरी जि.प शाळेत ही घटना घडल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.
बिस्कीटांची मुदत तपासली होती का? Chhatrapati Sambhajinagar ।
जिल्हा परिषद शाळेतील बिस्किटांमुळे विषबाधा झाल्याचे उघड झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक संतापले आहेत. शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यामधून विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याचं दिसत असताना पालकांमध्ये घबराट पसरू लागली आहे. विद्यार्थ्यांना बिस्किट देण्याआधी त्याची मुदत तपासली गेली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा
“सरकारचं धाकधुक पाकपुक व्हायलंय म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली” ; शरद पवार गटाच्या नेत्याची जहरी टीका





