Pujara Advice Suthar : “आयपीएलच्या मोहात पडू नकोस!”; मानव सुथारला चेतेश्वर पुजाराचा थेट इशारा; बीसीसीआयलाही दिला ‘हा’ खास सल्ला
Pujara Advice Suthar : भारताचा माजी दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने मानव सुथारला एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे.

Cheteshwar Pujara Advice To Manav Suthar Avoid IPL Trap Focus On Test Cricket : श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत १० विकेट्स घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या २४ वर्षीय युवा फिरकीपटू मानव सुथारच्या (Manav Suthar) कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याला भविष्यात रवींद्र जडेजाचा खरा वारसदार मानले जात असतानाच, भारताचा माजी दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) सुथारला एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. आयपीएलच्या (IPL) पैशांच्या मोहात आणि टी-२० क्रिकेटच्या नादात सुथारने आपली मूळ गोलंदाजी शैली बदलू नये, तसेच बीसीसीआयने त्याला ‘कसोटी स्पेशालिस्ट’ म्हणून जपून वापरावे, असे पुजाराने स्पष्ट केले आहे.
‘आयपीएल खेळ पण आपली ताकद विसरू नकोस!’
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना पुजारा म्हणाला, “सर्व तरुण खेळाडूंना टी-२० क्रिकेट खेळायचे असते, हे स्वाभाविक आहे. सुथारला आयपीएलमध्ये संधी मिळाली तर हरकत नाही, पण त्याने स्वतःची मूळ ताकद सोडू नये. व्हाईट बॉल क्रिकेटसाठी गोलंदाज सपाट (Flat Trajectory) चेंडू टाकतात, मात्र सुथारने कसोटीसाठी असलेली आपली क्लासिक शैली बदलू नये. भारताने त्याला दीर्घकाळ कसोटी क्रिकेटसाठी सुरक्षित ठेवायला हवे.”
गुजरात टायटन्सचा भाग; आतापर्यंत खेळले केवळ ५ सामने!
🚨Preserve yourself, don’t change your strengths for IPL lure – Pujara massive advice to Manav Suthar🤯
Cheteshwar Pujara said :🗣️
“His pace changed in the second innings. The moment he realized that, when we are looking at his dismissals, the last three wickets that he picked,… pic.twitter.com/N4k7M2Urai
— Akshat (@Cricketmythos) August 19, 2026
स्वतः १०३ कसोटी सामने खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आपल्या कारकिर्दीत केवळ ३० आयपीएल सामने खेळले आहेत. दुसरीकडे, मानव सुथार सध्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) संघाचा भाग आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ५ सामने खेळत २ विकेट्स मिळवले आहेत, ज्यामध्ये २०२६ च्या हंगामातील चार सामन्यांचा समावेश आहे. मात्र, कसोटीमध्ये त्याने अवघ्या दोन सामन्यांत तब्बल १७ विकेट्स घेत आपली लाल चेंडूवरील हुकूमत सिद्ध केली आहे.
‘चेंडूला फ्लाईट देणे हीच खरी ताकद; भारताला मिळाला हिरा!’
पुजाराने सुथारच्या गोलंदाजीचे विश्लेषण करताना सांगितले की, “चेंडूला हवेत फ्लाईट देणे आणि चेंडूचा वेग कमी ठेवून फलंदाजाला चकवणे ही सुथारची सर्वात मोठी ताकद आहे. गॉल कसोटीत चेंडू नवा असतानाही त्याने अचूक टप्प्यावर चेंडू फिरवला. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये धीम्या गतीने चेंडू टाकण्याची अजिबात भीती वाटत नाही. भारताला एक परिपूर्ण डावखुरा फिरकीपटू मिळाला असून तो भारतासाठी प्रदीर्घ काळ खेळू शकतो.”





