High court Clerk Exam : टायपिंग परीक्षेत गोंधळ अन् अभिजीत दिपके विद्यार्थांसह पुन्हा मैदानात; नेमकं काय घडलं?
High court Clerk Exam : पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी

High court Clerk Exam : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टायपिंग परिक्षेत गोंधळ उडाल्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेच्या सेंटरबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.
या आंदोलनात क्रॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके देखील सहभागी झाले आहेत. यावेळी अभिजीत दिपकेंसोबत विद्यार्य्थांनी पुर्नपरिक्षेच्या मागणीसाठी आंदोलन सूरू केले.
पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी
यावेळी अभिजीत दिपके म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत राज्यभर गोंधळ झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचं नाही तर नांदेड, कल्याण, ठाणे, नाशिक, वाशिम, भंडारा, गोंदियामध्ये ऑनलाइन परीक्षेत गोंधळ होत आहे. की -बोर्ड काम करत नाही, सर्व्हर काम करत नाही. 10 मिनिटात लॉग आऊट होऊन जात आहे. High court Clerk Exam
म्हणजेच एका शिफ्टमध्ये असलेले विद्यार्थी फेल झाले. एवढा सगळा गोंधळ असताना ही परीक्षा कशी होऊ शकते, त्यामुळं ही परीक्षा पुन्हा घेतली गेली पाहिजे. मुलांचा ऑनलाइन परीक्षेवर विश्वास नाही, ऑफलाइन परीक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत फेरपरीक्षा घेण्याबाबत नोटिफिकेशन काढलं जात नाही आणि विद्यार्थ्यांना हार्डकॉपी मिळाली पाहिजे. दिल्लीत 35 दिवस जंतरमंतरवर बसलो होतो, आता हेच आपलं जंतर मंतर आहे, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं.
नेमका वाद कशावरुन?
मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी 8 डिसेंबर 2025 ला जाहिरात काढली होती. त्यानंतर 16 ऑगस्ट 2026 ला संपूर्ण महाराष्ट्रात लिपिक पदासाठीची उपरोक्त टायपिंग परीक्षा सुरू झाली.
परंतु, काही परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना परीक्षा सुरु असताना सॉफ्टवेअरमध्ये ग्लीचेस आले. कीबोर्ड लहान मोठे होते. कीपॅड वरील की दबत नव्हत्या, स्क्रीन दिसत नव्हती, सगळ्यांचा लॉगीन सेम टाईमला झालं नाही, अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना सामोरी जावे लागले.
एजन्सीमार्फत राबविलेल्या या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींची तपासणी केली जात असून, पुढील योग्य त्या कारवाईबाबत उमेदवारांना अधिकृतरित्या कळवले जाईल, असे हायकोर्टाच्या नोटीसीमध्ये सांगण्यात आले. औरंगाबाद आणि कल्याण येथे काही तांत्रिक अडचणी आल्याचे अहवालात समोर आले आहे.
परंतु विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असलेल्या रीएक्झामची असून, याबाबत एकही शब्द न काढल्याने विद्यार्थी या नोटीसीवर नाराज आहेत. हायकोर्टाने काढलेल्या नोटीसीवर विद्यार्थी असमाधानी असून आंदोलनावर ठाम आहेत. High court Clerk Exam
हेही वाचा:






