मुंबई – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकात झालेली दुर्घटना दुःखद व दुर्दैवी आहे.पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचे व जखमींवर वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश दिले.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 28, 2022
याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
Chandrapur : बल्लारशहा रेल्वे स्थानकातील पुलाचा स्लॅब कोसळला; दुर्घटनेत 20 प्रवासी जखमी
दरम्यान, चंद्रपुर येथील बल्लारशहा रेल्वे स्थानकात रविवारी(दि.27) पुलाचा स्लॅब कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. रेल्वे स्थानकातील फूट ओवर ब्रिजचा एक भाग अचानक कोसळल्याने 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रेल्वे ट्रॅकवरुन कोणतीही रेल्वे जात नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.