Chandrahar Patil : सांगलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? चंद्रहार पाटील अन् श्रीकांत शिंदेंची गुप्त बैठक, फोटो व्हायरल…

सांगली : लोकसभा निवडणुकीवेळी सांगली मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा जोरदार विरोध असूनही उद्धव ठाकरे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहिले होते, तेच आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
त्याचे कारण म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. उद्योग उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट घडून आली होती. दरम्यान चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले होते. Chandrahar Patil |
असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एकीकडे चंद्रहार पाटील हे आपली शिंदे गटाशी कोणतीही चर्चा सुरु नाही असं दाखवून देतात, मात्र दुसरीकडे चंद्रहार पाटील गुप्तपणे शिंदे गटासोबत वाटाघाटी करत असल्याचे दिसत आहे. Uday Samant |
चंद्रहार पाटील, श्रीकांत शिंदे यांची भेट
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची बैठक झाली होती. या बैठकीला खासदार धैर्यशील माने हेदेखील उपस्थित होते. या तिघांमध्ये दिल्लीत चर्चा झाली होती. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते चंद्रहार पाटील?
दरम्यान चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले होते. पोस्टमध्ये त्यांनी लिहले होते की, मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २००५ सालापासून म्हणजेच जवळपास २० वर्षांपूर्वी पासूनचे माझे मित्र व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मला स्नेह भोजनाचे आमंत्रण दिले, भोजन करून १५ ते २० मिनिटात मी बाहेर पडलो. Eknath Shinde |
यावेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली. परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की. असं चंद्रहार पाटलांनी म्हटलं होतं. Uddhav Thackeray |





