Cell Broadcast Alert System : देशभरातील अँड्राईड आणि IOS स्मार्टफोनधारकांना शनिवारी सकाळी अचानक मोबाईल फोनवर आपातकालीन मेसेज आले. हा संदेश फोनवर आला तेव्हा फोनची रिंगटोन जोरात वाजत होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी अनेकांचे मोबाईल फोन वाजू लागले. यामुळे सुरुवातीला अनेकजण घाबरले, अनेकांना नेमकं काय घडलं समजले नाही. (Cell Broadcast Alert System) मात्र त्यानंतर या मागचे कारण सर्वांच्या लक्षात आले. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संयुक्तपणे ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी घेत आहेत. भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन सेल ब्रॉडकास्ट सुरु केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही, हा एक चाचणी संदेश आहे, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात मोबाईल वाजल्यास सतर्कतेचे मेसेज मिळू मिळतात. तुम्हाला असा मेजेस मिळाल्यास, घाबरण्याची गरज नाही. ही एक चाचणी आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि ज्योतिरादित्य सिंधिया २ मे रोजी या देशव्यापी मोबाईल-आधारित आपत्ती सूचना प्रणालीचे उद्घाटन केलं आहे. त्यानुसार नवीन सेवा लागू झाली आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम म्हणजे काय? (Cell Broadcast Alert System) Cell Broadcast Alert System : एकाचवेळी सर्वांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज अन् उडाला गोंधळ; यामागचं नेमकं कारण समोर सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम ही एक हायटेक आपत्कालीन चेतावणी प्रणाली आहे. याच्या माध्यमातून सरकार कोणत्याही आपत्ती किंवा धोक्याच्या परिस्थितीत थेट मोबाईल फोनवर अलर्ट पाठवू शकते. याचा वापर भूकंप, सुनामी, वीज कोसळणे, पूर, गॅस लीक, रासायनिक धोके तसेच इतर मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींमध्ये केला जाऊ शकतो. याद्वारे धोक्याची माहिती लोकांपर्यंत त्वरित पोहोचावी, हे सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. हे सिस्टम कसे काम करते? ज्या वापरकर्त्यांच्या फोनवर हा मेसेज येईल, त्यांच्या मोबाईलवर जोरात सायरनसारखा आवाज येईल आणि स्क्रीनवर फ्लॅश मेसेज दिसेल. वापरकर्त्यांना तत्काळ चेतावणी मिळेल. ही प्रणाली विशेषतः प्रभावित भागातील लोकांपर्यंत तात्काळ माहिती पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ‘SACHET’ सिस्टमद्वारे अलर्ट पाठवले जातील (Cell Broadcast Alert System) सरकारच्या माहितीनुसार हे अलर्ट स्वदेशी Integrated Alert System ‘SACHET’ च्या माध्यमातून पाठवले जातील. हे सिस्टम C-DOT (Centre for Development of Telematics) ने विकसित केले आहे. हे कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) वर आधारित असून, याची शिफारस इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) ने केली आहे. टेस्ट अलर्ट का पाठवले जात आहेत? (Cell Broadcast Alert System) सरकार देशभरातील मोबाईल नेटवर्क आणि अलर्ट सिस्टमची विश्वसनीयता तपासू इच्छित आहे, जेणेकरून प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी अलर्ट वेगाने आणि अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतील. NDMA ने स्पष्ट केले आहे की हे संदेश केवळ चाचणीचा भाग आहेत आणि नागरिकांनी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. सरकारचा हा उपक्रम केवळ मेसेज पाठवण्यापुरता मर्यादित नसून, भारताच्या डिजिटल आपत्ती व्यवस्थापन नेटवर्कला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जर तुम्हाला तुमच्या फोनवर आपत्कालीन सूचना मिळवायच्या असतील, तर तुम्हाला एक सेटिंग सक्षम करावी लागेल. याकरिता तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि ‘सेफ्टी अँड इमर्जन्सी’ वर टॅप करा. येथे, तुम्हाला ‘वायरलेस इमर्जन्सी अलर्ट’ हा पर्याय दिसेल. ‘टेस्ट अलर्ट’ हा पर्याय चालू करा. हेही वाचा: Supreme Court : मतमोजणीचा मार्ग मोकळा! सर्वोच्च न्यायालयाने TMCला मोठा धक्का देत पर्यवेक्षकांवरील आक्षेप फेटाळला