CBSE on Three-Language: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; CBSE ने तिसऱ्या भाषेच्या बोर्ड परीक्षेवर घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
CBSE on Three-Language: सीबीएसईने (CBSE) त्रिभाषा धोरणासंदर्भातील संभ्रम दूर करत विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

CBSE on Three-Language: सीबीएसईने (CBSE) त्रिभाषा धोरणासंदर्भातील संभ्रम दूर करत विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सत्र २०२६-२७ मधील सध्याच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांवर नवीन भाषा धोरण लागू होणार नाही. त्यामुळे यंदा बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही अतिरिक्त विषय किंवा नवीन नियमांचा सामना करावा लागणार नाही.
सीबीएसईच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा धोरण टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांवर अचानक अतिरिक्त शैक्षणिक भार पडू नये, यासाठी आवश्यक अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य निश्चित कालावधीत उपलब्ध करून दिले जाईल.
कोणत्या वर्गासाठी काय नियम? (CBSE on Three-Language)
इयत्ता १० वी (सत्र २०२६-२७)
सध्याच्या १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ते पूर्वीप्रमाणेच दोन भाषांचा अभ्यास करतील आणि तिसरी भाषा घेणे बंधनकारक असणार नाही.
इयत्ता ९ वी (सत्र २०२६-२७)
या विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल. त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे.
* जर विद्यार्थी आधीच दोन भारतीय भाषा शिकत असेल, तर तिसरी भाषा म्हणून भारतीय किंवा परदेशी भाषा निवडता येईल.
* जर विद्यार्थी एक भारतीय आणि एक परदेशी भाषा शिकत असेल, तर त्याला आणखी एक भारतीय भाषा शिकावी लागेल.
* दोन परदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकदाच विशेष सवलत देण्यात आली असून, त्या भाषा सुरू ठेवत त्यांना एक भारतीय भाषा अतिरिक्त शिकावी लागेल.
तिसऱ्या भाषेच्या परीक्षेबाबत मोठा दिलासा (CBSE on Three-Language)
सध्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची सीबीएसई बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. या विषयाचे मूल्यांकन केवळ शालेय स्तरावरच केले जाईल.

CBSE on Three-Language: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; CBSE ने तिसऱ्या भाषेच्या बोर्ड परीक्षेवर घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
इयत्ता ७ वी आणि ८ वी
हे विद्यार्थी पुढे ९ वी आणि १० वीमध्ये गेल्यानंतर त्रिभाषा धोरणानुसार शिक्षण घेतील. दोन परदेशी भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांना केवळ एक भारतीय भाषा अतिरिक्त घ्यावी लागेल. या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. मूल्यांकन शाळेमार्फतच होईल.
इयत्ता ६ वी आणि त्यानंतरच्या तुकड्या
या विद्यार्थ्यांसाठी नवीन धोरण पूर्णपणे लागू असेल. तीन भाषांपैकी दोन भारतीय भाषा अनिवार्य असतील. हे विद्यार्थी इयत्ता १० वीमध्ये पोहोचल्यानंतर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा देखील देतील. एनसीईआरटी २२ अनुसूचित भारतीय भाषांमध्ये नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणार आहे.
कोणाला मिळणार सूट?
सीबीएसईने काही विद्यार्थ्यांना या नियमातून सूट दिली आहे.
* दिव्यांग (CwSN) विद्यार्थ्यांना आवश्यक ती सवलत दिली जाईल.
* भारताबाहेरील सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय भाषा शिकणे अनिवार्य राहणार नाही.
* परदेशातून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तिसरी भारतीय भाषा शिकण्यापासून सूट मिळेल.
दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाल्यास काय?
पालकांच्या नोकरी किंवा इतर कारणांमुळे दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाल्यास विद्यार्थी पूर्वी निवडलेल्या तिसऱ्या भाषेचा अभ्यास सुरू ठेवू शकतो. अशा परिस्थितीत संबंधित शाळेने आवश्यक शैक्षणिक व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
शिक्षकांची व्यवस्था कशी होणार?
सीबीएसईने सांगितले की, गरजेनुसार शाळा विद्यमान शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक तसेच ऑनलाइन किंवा हायब्रीड पद्धतीचा वापर करून भाषा शिक्षणाची व्यवस्था करू शकतात.
सीबीएसईचे स्पष्टीकरण CBSE on Three-Language:
सीबीएसईने स्पष्ट केले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत हा बदल करण्यात येत आहे. या धोरणाचा उद्देश विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढवणे नसून भारतीय भाषांना प्रोत्साहन देणे आणि भाषा शिक्षण अधिक सोपे, रंजक व उपयुक्त बनवणे हा आहे. तसेच या बदलामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.





