तंत्रज्ञानावर कायम अवलंबून राहू शकत नाही – सरन्यायाधीश चंद्रचूड

मदुराई – माझा तंत्रज्ञानावर विश्वास आहे, परंतु कालच तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याचे दुष्परिणाम पाहिले. काल मायक्रोसाॅफ्ट विंडेजमध्ये झालेल्या गोंधळामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागला. हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे कोणालाही सर्व काळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहता येणार नाही. पण मला वाटते की हे मदुराईच्या लोकांचे प्रेम आहे ज्यामुळे मी आज येथे उपस्थित आहे, अए प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सरन्यायाधिश बोलत होते. मायक्रोसॉफ्टच्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या अपडेटमधील तांत्रिक दोषामुळे जगभरात झालेल्या गोंधळाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
चंद्रचुड पुढे म्हणाले, ‘मदुराईला थुंगा नगरम किंवा कधीही न झोपणारे शहर म्हणतात कारण तेथील बाजारपेठा लोकांसाठी नेहमी खुल्या असतात. या शहराला भेट देणाऱ्या सर्वांसाठी खरोखरच खूप काही आहे. हे या महान शहराची आमंत्रित आणि आदरातिथ्य संस्कृती प्रतिबिंबित करते. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी खंडपीठासाठी मदुराईची निवड झाली यात आश्चर्य नाही. या अर्थाने, मदुराई हे शाश्वत प्रतीक आहे की न्याय कधीही झोपत नाही. असाच वारसा भारतीय न्यायव्यवस्थेला आहे, ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा.





