BJP on Revanth Reddy। तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या मुल्सिमनबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे. राज्याचे भाजपचे अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनी रेवंत रेड्डी यांच्यावर व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. “काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस” असे रेड्डी म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर रामचंद्र राव यांनी, “काँग्रेसच्या राजवटीत सर्वाधिक जातीय दंगली झाल्या. मग काँग्रेस म्हणजे मुस्लिम असे कसे म्हणता येईल? असा सवाल केला. तसेच मुख्यमंत्री पोटनिवडणूकहरणार असल्याने हताश आहेत, म्हणून त्यांना फक्त मुस्लिम मते हवी आहेत आणि हिंदू मतांचा विचार करत नाहीत.”असे म्हणत त्यांनी ए. रेवंत रेड्डी यांच्यावर टीका केली आहे. यापूर्वी, केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी तेलंगणा मंत्रिमंडळात माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या अलिकडेच समावेशाला विरोध केला होता. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एका निवडणूक रॅलीत किशन रेड्डींवर टीका केली. रेवंत रेड्डी म्हणाले, “काँग्रेस सरकारने अल्पसंख्याकांना अनेक संधी दिल्या आहेत.” फक्त काँग्रेसनेच अल्पसंख्याकांना उच्च पदे दिली आहेत. “काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस.” आदल्या दिवशी एन. रामचंद्र राव यांनी पीटीआय-व्हिडिओला सांगितले की, जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत मुस्लिम मते मिळवण्यासाठी रेड्डी मुस्लिम तुष्टीकरणात गुंतले आहेत. BJP on Revanth Reddy। राज्य भाजप अध्यक्ष म्हणाले की, निवडणूक प्रचारादरम्यान टोपी घालून, रेवंत रेड्डी २० टक्के मुस्लिम मते मिळवण्यासाठी रेवंत उद्दीन बनले आहेत. ते म्हणाले, “हे स्पष्ट आहे की त्यांची (रेड्डींची) विधाने व्होट बँकेच्या राजकारणाचा भाग आहेत. ते म्हणतात की काँग्रेसमुळे मुस्लिमांना आदर मिळतो. काँग्रेसने मुस्लिमांचा आदर केला नाही. खरं तर, काँग्रेस मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर करून त्यांचा सन्मान दुखावत आहे. खरा प्रश्न हा आहे की काँग्रेस मुस्लिमांना शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार आणि घरे देत आहे की नाही.” एन. रामचंद्र राव यांनी आरोप केला की भारत राष्ट्र समिती (बीआरएस) समान धोरणे स्वीकारत आहे आणि दोन्ही पक्ष २० टक्के मुस्लिम मतांसाठी ८० टक्के हिंदू लोकसंख्येकडे दुर्लक्ष करत आहेत. जूनमध्ये बीआरएस आमदार एम. गोपीनाथ यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. भाजपने दीपक रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, तर गोपीनाथ यांच्या पत्नी सुनीता या बीआरएस उमेदवार आहेत. सत्ताधारी काँग्रेस उमेदवार नवीन यादव यांना असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमचा पाठिंबा आहे. BJP on Revanth Reddy।