Maratha Reservation : लवकरच मराठा आरक्षणावर मोठा निर्णय? राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे, राज्याच्या विविध भागातून मराठा आंदोलक आझाद मैदानावर ठिय्या मांडून बसले आहेत. मात्र, काही आंदोलनकांकडून हुल्लडबाजी केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अशा आंदोलकांनी घरी गेले तरी चालेल असं जरांगे असं थेट सांगितंल आहे.
काल मराठा आरक्षणप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज दुपारपर्यंत मुंबईतील आझाद मैदान आणि सीएसटी परिसरातील गाड्या हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काल मध्यरात्रीपासून आंदोलकांना गाड्या हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक या परिसरात ठाम मांडून बसल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळित झालं आहे. जरांगे हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, या मागणीवर ठाम आहेत.
लवकरच नवीन जीआर?
त्यामुळे आता या प्रकरणी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला असून एक मसुदा तयार करण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांना हैद्राबात गॅझेटियरमधील नोंदणीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय करता याची पूर्तता केली जात आहे. या मुसद्याला लवकरच अंतिम स्वरुप दिले जाणार असल्याचं मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणसंदर्भात लवकरच नवीन जीआर सरकार काढण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी बैठक
या प्रकरणी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमिती, ॲडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ, न्या. संदीप शिंदे यांची ही बैठक झाली. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं
मराठवाड्यातील मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधी ठोस निर्णय करता येई शकेल असं सरकारला वाटते, त्यासाठी आम्ही एक मसुदा तयार केला आहे. ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : भारत-चीन-रशियाची मैत्री! जिनपिंग अन् पुतीन यांच्यासोबत नवे समीकरण ; मोदींचा थेट वार, अमेरिकेला मोठा धक्का





