मुंबई – बांगलादेशविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता बीसीसीआयने ( BCCI) मोठ्या कारवाईच्या दीशेने पाऊले उटलली आहेत. संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर मायदेशी परतल्यावर लगेचच बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण, कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
#INDvPAK : भारताबाबत आता ICC ने मध्यस्थी करावी; PCB च्या रमीझ राजा यांची विनवणी
ऑस्ट्रेलियात नुकत्यात पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआयने संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली होती, आताही अशाच काही कठोर निर्णयांचे संकेतही मिळत आहेत. सातत्याने होत असलेली अपयशी कामगिरी, मालिकांमधील पराभव, खेळाडूंच्या दुखापती, वर्कलोड तसेच तीनही प्रकारात तीन वेगवेगळे कर्णधार असे काही मुद्दे या बैठकीत चर्चिले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.