Jitendra Awhad | येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयानुसार सर्व कत्तलखाने या कालावधीत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. लोकांनी कधी काय खावे आणि विकावे याला कायद्यांनी बंदी दिली का? जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंद करण्यात येणार आहे. यांच्या बापाचे राज्य आहे का लोकांनी कधी काय खावे आणि विकावे याला कायद्यांनी बंदी दिली का? हा काय तमाशा आहे? बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. मनुष्य प्राण्याच्या दातची रचना बघितली तर कोणाला ही विचारा ही मांसाहारी आहे की नाही हजारो वर्षांचा इतिहास आहे. माकडा पासून आपण झालो, यात दाताची रचना झाली, यावरून कळत तुम्ही मांसाहारी आहात.” ‘आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा’ जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी आमचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहात, हा काय तमाशा आहे? कल्याण डोंबिवली पालिका बहुजन समाजाला विरोध करत आहे. माझं तर विचार आहे की, त्या ठिकाणीच मटणाची पार्टी ठेवणार आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान झालं. मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा.” Jitendra Awhad | दरम्यान, हा निर्णय 19 डिसेंबर 1988 रोजीच्या प्रशासकीय ठरावाच्या आधारे घेण्यात आला असून, बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी त्यास मान्यता दिली आहे. यावरुन आव्हाडांनी त्यांच्यावर देखील निशाणा साधला. Jitendra Awhad | “आदेश काढणारी ही गायकवाड बाई कोण आहे तिला कोणी अधिकार दिलेला आहे? शासन नावाचं काय आहे की नाही? लोकप्रतिनिधी नाही तिकडे आयुक्तांनी बाहेर येऊन त्यांची भूमिका काय हे सांगावं. शासनाला खाणं निवडण्याचा अधिकार दिला का? कल्याण, मुंबईमध्ये श्रीखंडपुरी खावी असे शासनाचे आदेश आहेत का?” असा सवाल आव्हाडांनी केला. Jitendra Awhad | “मी स्वतः कल्याण डोंबिवलीमधील कोणाच्या तरी घरी जाऊन 15 ऑगस्टच्या दिवशी मटन, मच्छी जेवणार आहे. तुमच्यात हिंम्मत असेल तर मला अटक करून दाखवा,” असं थेट आव्हानही आव्हाडांनी दिलं आहे. हेही वाचा : Rohit Pawar Post : पुण्यात वैष्णवी हगवणे घटनेची पुनावृत्ती; रोहित पवारांची पोस्ट म्हणाले “अवघ्या दीड वर्षात विवाहितेला जीव गमवावा लागत असेल तर..”