Attari-Wagah Border : अटारी-वाघा सीमेवरील रिट्रीटची वेळ बदलली; आता ‘ह्या’ वेळेत होणार सेरेमनी
येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणा-या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या (Attari - Wagah Border) वेळेत बदल करण्यात आला आहे.

Attari – Wagah Border : येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणा-या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या (Attari – Wagah Border) वेळेत बदल करण्यात आला आहे.
अटारी-वाघा सीमेवर दररोज होणारी ही देशभक्तीने भरलेली सेरेमनी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. नवीन निर्णयानुसार, आता रिट्रीट सेरेमनी (Attari – Wagah Border) संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होऊन ६:०० वाजेपर्यंत चालेल.
यापूर्वी रिट्रीट सेरेमनी ५ वाजता सुरू होऊन ५:३० वाजता संपत होती. हवामान आणि दिवसाच्या कमी-जास्त होणाऱ्या प्रकाशाचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अधिका-यांचे म्हणणे आहे की, प्रेक्षकांना चांगला अनुभव देण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वेळेत हा बदल आवश्यक होता. ही नवीन वेळ आज म्हणजेच १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.
म्हणजेच, आता जे पर्यटक किंवा स्थानिक लोक ही सेरेमनी (Attari – Wagah Border) पाहण्याची योजना करत आहेत, त्यांना नवीन वेळेनुसारच पोहोचावे लागेल. बीटिंग रिट्रीट सेरेमनी ही भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांद्वारे केली जाणारी एक विशेष परंपरा आहे, ज्यात उत्साह, शिस्त आणि देशभक्तीची झलक पाहायला मिळते.






