“भाभीजी कहाँ पर हैं?” ; असदुद्दीन ओवैसी यांचा पंतप्रधानांना खोचक सवाल, का विचारला हा प्रश्न ?वाचा

Asaduddin Owaisi on PM Modi । एआयएमआयएम असदुद्दीन ओवैसी यांनी अलीकडेच यूसीसी (समान नागरी संहिता) च्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. त्यांनी यावेळी मोदींना एक खोचक सवाल देखील केला आहे ज्याची चर्चा आता सर्वत्र होताना दिसून येत आहे. असदुद्दीन ओवैसी हे जगभर प्रवास करणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचा देखील एक भाग आहेत. हे शिष्टमंडळ अनेक देशांमध्ये पाकिस्तानच्या काळ्या कृत्यांबद्दल बोलेल. ओवेसी यांनी शिष्टमंडळाबद्दलही बोलले आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, ओवैसी यांनी, “भाजपने उत्तराखंडमध्ये यूसीसी आणला आहे, हा कसला कायदा आहे, तुम्ही त्यात अपवाद दिला आहे, हा कायदा हिंदू अविभक्त कुटुंबावर लागू होणार नाही, जर मला घटस्फोट घ्यायचा असेल तर मी माझ्या पद्धतीने करेन, पण मोदी म्हणतात नाही, मी सांगतो त्या पद्धतीने घटस्फोट दिला पाहिजे, मग मला सांगा भाभीजी कुठे आहेत?”असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, “उत्तराखंडचा युसीसी कलम २५ च्या विरोधात आहे, आमचे लग्न आमच्या धर्माच्या विरोधात आहे का, जर तुम्हाला अशा प्रकारे लग्न करायचे नसेल तर विशेष विवाह कायदा आहे. कलम २५ हे विवेकाचे स्वातंत्र्य आहे. कोणी म्हणेल की आम्ही लग्न करणार नाही, आम्ही प्रौढ आहोत, आम्ही एकत्र राहू, कायदा त्याला परवानगी देतो. माझा विवेक मला सांगतो की लग्न होईपर्यंत तुम्ही कोणत्याही महिलेला स्पर्श करू शकत नाही. हे कलम १४ चे उल्लंघन आहे.”
ओवेसींनी भाजपवर निशाणा साधला Asaduddin Owaisi on PM Modi ।
मशिदींचा उल्लेख करताना ओवेसी यांनी, “उत्तराखंडमध्येच १७० मदरसे सील करण्यात आले. उत्तर प्रदेशात मशिदी, मदरसे, धार्मिक स्थळे आणि ईदगाहसह ३५० धार्मिक स्थळे सील करण्यात आली आहेत आणि ती बुलडोझरद्वारे पाडण्यात येतील. गुजरातमध्ये १९९८ पासून भाजप सत्तेत आहे. २५ वर्षांपासून सत्तेत आहे. अहमदाबादमधील चांडोला तलावावर ३० वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहत आहेत. ४-८ हजार झोपड्या पाडण्यात आल्या आणि असे म्हटले गेले की बांगलादेशी येथून बाहेर पडले आहेत. हे गरीब लोक कुठे जातील, या देशातील गरिबांचे काय होईल.? असे काही प्रश्न यावेळी त्यांनी केले.
सर्वपक्षीय शिष्टमंडळात सामील झाल्याबद्दल ओवेसी काय म्हणाले? Asaduddin Owaisi on PM Modi ।
पुढे ओवेसी म्हणाले, “तर मग मी संसदेत बसणे थांबवावे का? तुम्ही सरकारी शिष्टमंडळात जात आहात, भोपाळच्या एका मंत्र्यांनी आमच्या मुलीबद्दल बकवास बोलले, जर तुम्ही परदेशात गेलात तर जग तुम्हाला प्रश्न विचारेल, मी म्हणालो की मी उत्तर देऊ शकतो. भाजपचे लोकही जात आहेत, ते फक्त आम्हालाच विचारतील का?”





