Asaduddin Owaisi on Pakistan । जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानविषयी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानची तुलना दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (IS) शी केली होती. त्यानंतर आता त्यांनी पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीरच्या सैन्याविरुद्धही गर्जना केली आहे. यावेळी फक्त घरात घुसुन मारू नका Asaduddin Owaisi on Pakistan । एका वृत्तवाहिनीशी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी २०१९ मध्ये झालेल्या पठाणकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याचाही उल्लेख केला आणि म्हणाले की यावेळी त्यांच्या (पाकिस्तानच्या) घरात घुसून त्यांना मारू नका, त्यांच्या घरात घुसून जाऊन त्यांच्या समोर बसा. २०१९ च्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेल्या हवाई हल्ल्याचा संदर्भ देताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “त्यावेळी आमच्याकडे एक संधी होती. आपण लाँचिंग पॅड किंवा दहशतवादी आपल्या देशात प्रवेश करतात ती जमीन ताब्यात घेतली असती. ते पुढे म्हणाले की, मी नरेंद्र मोदी सरकारला सांगू इच्छितो की, यावेळी जर आपण त्यांच्या घरात प्रवेश केला तर आपण तिथेच बसले पाहिजे. देशातील जनतेच्या मोदी सरकारकडून अपेक्षा वाढल्या Asaduddin Owaisi on Pakistan । पाकव्याप्त काश्मीरबाबत विचारलेल्या प्रश्नावर एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, तो भारताचा एक भाग आहे आणि हा संसदेचा ठराव आहे. पीओके हा देशाचा अविभाज्य भाग आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. ते म्हणाले की, पहलगाममध्ये जे काही घडले, त्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी आपल्या देशातील नागरिकांची हत्या केली. आम्ही याचे उत्तर देऊ. ओवैसी म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट हल्ल्यामुळे देशातील जनतेच्या मोदी सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ओवेसी म्हणाले की आम्हाला दहशतवाद थांबवायचा आहे आणि सर्व पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले आहे की ते सरकारसोबत आहेत. देशातील जनतेला आशा आहे की सरकार सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटपेक्षाही अधिक मजबूत पावले उचलेल. भारत आणि पाकिस्तानमधील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, येथे अजूनही लोकशाही आहे, पाकिस्तानमध्ये हुकूमशाही आहे. पाकिस्तानमध्ये लष्करासह पाच-सहा कुटुंबे संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवतात. पाकिस्तानच्या नेत्यांनी इस्लामच्या नावाखाली तेथील लोकांना विभागले आहे. तुम्ही (पाकिस्तानचे लोक) स्वतःकडे आणि भारताकडे पहा. आज भारत कुठे उभा आहे आणि तुम्ही कोणत्या खड्ड्यात उभे आहात?