Arvind Sawant : “एखादा खासदार-आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,” बाळासाहेबांच्या आदेशाची अरविंद सावंतांकडून आठवण
Arvind Sawant : उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत फोनवर चर्चा

Arvind Sawant : महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या नऊपैकी सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याची चर्चा आहे.
या सहा खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबतचा अद्याप कोणताही फोटो समोर आलेला नाही.
दुसरीकडे, पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर असतानाच दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांची बैठक होत आहे. मात्र त्यापूर्वी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी, एखादा खासदार, आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा म्हटल्याची आठवण अरविंद सावंत यांनी सांगितली. त्यामुळे पक्ष फुटीचा हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
“वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा, हा बाळसाहेबांचा विचार आहे त्याची आठवण करुन देतो,” असं अरविंद सावंत म्हणाले.
संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा (Arvind Sawant )
तर संजय राऊत पुढे म्हणाले की, संसदेतील आमच्या पक्षाच्या कार्यालयात 11 वाजता बैठक होणार आहे. तुम्ही ज्यांची नावं घेताय, त्यांना वाटतं एकदा त्यांनी तोडून दाखवलं आता सांगतो तोडून दाखवा, तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे.
लोकशाहीचा खेळ लावलाय का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आली का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देताय, आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. आमच्या पार्टीकडून लोक निवडून आले, आम्ही मेहनत करतो, उद्धव ठाकरे मेहनत करतात, तुम्ही त्यांना किडनॅप करता ही कोणती लोकशाही आहे.
तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ, देशाची प्रतिष्ठा, नियम, संविधानासोबत तुम्ही खेळ करता. नरेंद्र मोदी विदेशात जाऊन मोठ्या बाता करतात त्यांनी देशात काय सुरु आहे ते पाहावं, असेही संजय राऊत म्हणाले. (Arvind Sawant )
भाजपनं देशाच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला (Arvind Sawant )
“आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात, पैशांची प्रलोभन दाखवल्यावर ताबडतोब जो शेजेला जाईल त्याच्या शेजेला जातात, ही प्रवृत्ती वाढत राहिली तर महाराष्ट्राची परंपरा आहे त्याचा गोलपीठा झाला आहे. शिंदे गटाचे लोक गोलपीठातील दलाल आहेत. दलाल निर्माण करण्याचं काम भाजपनं करुन देशाच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे,” अशीही टीका राऊत यांनी भाजपवर केली.
मतदारसंघात जाऊन राडे करायचे (Arvind Sawant )
उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवारांचा फोन झाला, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:







