Arvind Kejriwal Meditation। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. होशियारपूर जिल्ह्यातील आनंदगड गावात असलेल्या विपश्यना ध्यान केंद्रात अरविंद केजरीवाल ध्यान करण्यासाठी पोहचले आहेत. दरम्यान, केजरीवालयांच्या ध्यान धारणेवरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. “इतक्या वाहने आणि सुरक्षेसह कोण विपश्यना घेते ? असा अस्वल करत भाजपने त्यांच्या व्हीआयपी संस्कृतीवर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या ध्यान धारणेवर बोलताना मंत्री मनिंदर सिंग सिरसा यांनी, “एकेकाळी वॅगनआरमध्ये सामान्य माणूस असल्याचे भासवणारे अरविंद केजरीवाल आता बुलेटप्रूफ लँड क्रूझर, १०० हून अधिक पंजाब पोलिस कमांडो, जॅमर आणि रुग्णवाहिकांच्या भव्य ताफ्यात व्हीआयपी महाराजांसारखे फिरतात आणि शांततेसाठी विपश्यना करतात.”असे म्हणत खोचक टीका केली आहे. ते पुढे म्हणाले,”जर सत्ता ही त्यांची परीक्षा असेल तर ते त्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पंजाबच्या करदात्यांच्या पैशातून भव्य सुरक्षा परेडची आवश्यकता कोणत्या प्रकारच्या विपश्यनेसाठी आहे? मुख्यमंत्री भगवंत मान देखील ताफ्यात नाहीत. तुमचे सत्य उघड झाले आहे, कपट, ढोंगीपणा आणि व्हीआयपी अहंकार शिगेला पोहोचला आहे.” तर दुसरीकडे खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना, “ज्यांनी त्यांना इतके प्रेम दिले आहे, त्यांना केजरीवाल इतके का घाबरतात? संपूर्ण जगाला व्हीआयपी संस्कृतीसाठी दोष देणारे केजरीवाल आज डोनाल्ड ट्रम्पपेक्षा मोठे सुरक्षा कवच घेऊन फिरत आहेत. पंजाबसारख्या महान राज्याला सर्वांनी त्यांच्या ऐषोआरामाचे साधन कसे बनवले आहे हे आश्चर्यकारक आहे.” असे म्हटले आहे. दिल्लीत ‘आप’ला २२ जागांपर्यंतच मर्यादित Arvind Kejriwal Meditation। २०१५ ते २०२४ पर्यंत दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी फक्त २२ जागा जिंकता आल्या. भाजपने ४८ जागा जिंकून केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे वर्चस्व संपुष्टात आणले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन आणि सोमनाथ भारती यांच्यासह ‘आप’चे अनेक मोठे नेते पराभूत झाले. पंजाबमध्ये आपचे आमदार फुटू शकतात? Arvind Kejriwal Meditation। पराभवानंतर, पक्षाच्या दिल्ली युनिटकडून संघटनात्मक बैठका घेतल्या जात आहेत. निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या नेत्यांनाच संघटनेत जबाबदारी दिली जाईल, असे संयोजक गोपाल राय म्हणाले. केजरीवाल यांचा पंजाब दौरा देखील महत्त्वाचा आहे कारण काँग्रेसने दावा केला आहे की अनेक आप आमदार त्यांच्या छावणीत सामील होण्यास तयार आहेत.