अररिया – बिहार मधील अररियामध्ये भीषण अपघात होऊन या अपघातात पाच मित्रांनी जीव गमावला आहे. हे युवक अनंत यात्रे वरुन परत येत असताना कारवरचे नियंत्रण सुटून ती कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कलानंद मंडल,सुनील करदार, सुनील मंडल,धनंजय साह, व नवीन साह असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पाच मित्रांची नावे आहेत.
हा अपघात पलासी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कालियागंज मार्ग-डाला वळणावर झाला असून येथील स्थानिकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. ह्युंदाई कारने हे पाच मित्र यात्रा करून परत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ती कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पलटी झाली कारमध्ये असलेल्या पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.