अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान या दोघांच्या गुपचूप लग्नाने त्यांच्या चाहत्यांना त्यावेळी सुखद आनंद दिला होता, पण जेव्हा हे दोन स्टार्स एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हा चाहत्यांचे मने दुखावली. अमृता सिंग तिच्या लग्नाला चुकीचे मानते.
अमृता सिंगने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या लग्नाबद्दल बोलले आहे. यापूर्वीही या दोघांच्या अयशस्वी लग्नाची बरीच चर्चा झाली आहे. आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न केले. त्याचा परिणाम असा झाला की हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. यानंतर, सारा आणि इब्राहिमच्या जन्मानंतर 13 वर्षांनी त्यांचे नाते संपुष्टात आले.
अमृताने सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. लग्नानंतरच तिने अभिनयाच्या जगाचा निरोप घेतला आणि आपल्या कौटुंबिक जीवनाकडे पूर्ण लक्ष दिले. पण, त्या काळात सैफ त्याच्या करिअरला सुरुवात करत होता आणि वेगवेगळ्या हिरोइन्ससोबत चित्रपट करत होता. अमृताला हे अजिबात मान्य नव्हते आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले.
एका मुलाखतीदरम्यान अमृता सिंगने तिच्या लग्नाविषयी सांगितले होते. ज्यामध्ये तिने म्हटले होते की, जर तिच्या मुलीनेही तिच्यासारखे गुपचूप लग्न करण्याची चूक केली तर ती तिला चापट मारेल. तिने आयुष्यात केलेल्या चुका आपल्या मुलांनी पुन्हा घडवाव्यात असे तिला वाटत नाही. या चुकीमुळे आज अमृता सिंग एकाकी आयुष्य जगत आहे. त्याचवेळी सैफ अली खान अभिनेत्री करीना कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असून त्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.’ लग्न करून जे अमृता सोबत झाले ते तुच्या मुलीसोबत होऊ नये असे तिला वाटते.