“असीम मुनीर यांची मानसिकता भारताविरोधी म्हणूनच सीमेवर…” ; इम्रान खान यांच्या बहिणीचे महत्वाचे विधान

Aleema Khan on India। पाकिस्तानचे राजकारण सध्या अशांतता आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेले आहे. या वातावरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहीण अलिमा खान यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विचारसरणीबद्दल अनेक गंभीर दावे केले आहेत, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
अलीमा खान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, “सध्याच्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांची विचारसरणी अत्यंत कठोर आणि कट्टरपंथी आहे. असीम मुनीर यांची मानसिकता भारताविरुद्ध आहे, म्हणूनच ते सीमेवर तणाव वाढवणाऱ्या निर्णयांना प्रोत्साहन देतात” असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच अलीमा यांनी,”मुनीर यांच्या विचारसरणीशी असहमत असलेल्यांना लक्ष्य केले जाते आणि ही वृत्ती पाकिस्तानी राजकारणाला आणखी अस्थिर करत आहे” असा दावा देखील त्यांनी केला आहे.
इम्रान खानला भारताशी संबंध सुधारायचे होते Aleema Khan on India।
अलिमा खान यांच्या मते, इम्रान खान यांचा भारताबाबत नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यांच्या भावाने अनेक वेळा भारताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय नेतृत्व आणि भाजपशी संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली” अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. अलीमा यांच्या मते, “जेव्हा जेव्हा पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी नेतृत्व सत्तेवर येते तेव्हा भारतविरोधी वातावरण तयार होते.”
इम्रान खानच्या मुलांचे विधान
इमरान खानच्या बहिणीव्यतिरिक्त, त्यांची मुले कासिम खान आणि सुलेमान खान यांनीही पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. अलिकडच्याच एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की त्यांना त्यांच्या वडिलांच्या जीवाबद्दल गंभीर चिंता आहे. दोन्ही मुलांनी म्हटले आहे की त्यांना भीती आहे की सरकार इम्रान खानच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती लपवत आहे, जी सामान्य नियंत्रणाबाहेर आहे. कासिम आणि सुलेमान यांनी सांगितले की गेल्या ४७ दिवसांपासून त्यांना त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली नव्हती, जे रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहेत.
इम्रान खान यांनीही प्रत्युत्तर दिले Aleema Khan on India।
तुरुंगातून पाठवलेल्या संदेशात इम्रान खान यांनी लष्करप्रमुखांवर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की जनरल मुनीर खान पाकिस्तानी राजकारणावर नियंत्रण ठेवू इच्छितात आणि देश एका खोल संकटात बुडण्याचे कारण त्यांच्यामुळेच आहे. इम्रान खान म्हणाले की त्यांना ज्या दबावाचा आणि छळाचा सामना करावा लागत आहे तो कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत अस्वीकार्य आहे. त्यांनी इशारा दिला की जर तुरुंगात त्यांना काही झाले तर लष्करप्रमुख पूर्णपणे जबाबदार असतील.





