Akhilesh yadav India Aghadi – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला राज्यात लोकसभेसाठी अवघ्या दोन जागा सोडण्याचे ठरवल्यानंतर, आता उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्षाने काँग्रेसला किरकोळीत काढले आहे. राज्यातील ८० पैकी अवघ्या १५ जागा सपाने काँग्रेसला देऊ केल्या आहेत; आणि असेही बजावले आहे की, या १५ जागांपेक्षा अधिक जागा काँग्रेसने मागितल्या तर उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी होणार नाही. त्यामुळे काँग्रेसची अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी झाली आहे.
लोकसभा निवडणुकीला फारसा वेळ उरलेला नाही. मात्र विरोधी पक्ष ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) यांच्यात जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नाही, हेच या घटनेवरुन दिसून येत आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाने (आरएलडी) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशातील जागावाटपाचे गणित पुन्हा एकदा बिघडले आहे. त्यामुळे सध्या समाजवादी पक्षाने काँग्रेसला दिलेल्या अल्टिमेटमचीच राज्यात चर्चा सुरु आहे. | Akhilesh yadav India Aghadi
जागांच्या मुद्यावर काँग्रेसला आज सपाला उत्तर द्यायचे आहे. उत्तर प्रदेशातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची शुक्रवारी चंदौली जिल्ह्यातून सुरुवात झाली. रायबरेलीतील या यात्रेत सहभागी होणार असल्याचं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातून राजस्थानकडे जाईल. | Akhilesh yadav India Aghadi
मात्र, यापूर्वी विरोधी आघाडी ‘इंडिया’मधील जागावाटपाबाबत अखिलेश यादव म्हणाले होते की, ‘जागा वाटपाबाबत ज्या पातळीवर चर्चा व्हायला हवी होती, ती झाली आहे आणि त्यांनाही माहिती देण्यात आली आहे. जागा वाटपाबाबत जवळपास एकमत झाले आहे. निवडून येण्याची क्षमता आणि विद्यमान सदस्याचा पक्ष या तत्त्वानुसार जागा वाटल्या जातील. याबबात काँग्रेस हायकमांडशी आधीच चर्चा केली आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत कोणतीही संदिग्धता नाही.