Ajit Pawar : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातात अजित पवारांसह (Ajit Pawar) विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर विविध शंका, अफवा आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वी प्रश्न उपस्थित केले होते, परंतु आता पवार कुटुंबाकडून प्रथमच या घटनेवर थेट आणि तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या. त्यांनी स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि विमान कंपनीच्या दाव्यांवर आधारित विमान कंपनीचा दावा संशयास्पद वाटत असल्याचे सांगितले. यांत्रिक बिघाड झाला असावा, असे मत व्यक्त करत त्यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. Ajit Pawar रोहित पवारांनी उपस्थित केलेले 5 प्रमुख तांत्रिक प्रश्न 1. विमानात नेमका काय बिघाड झाला होता? हे केवळ मेकॅनिकल फेल्युअर होते का, की त्यामागे इतर कारणे होती? 2. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी त्याची रीतसर तपासणी (Pre-flight inspection) केली होती का? ही तपासणी करणारे कर्मचारी नक्की कोण होते? 3. विमानाचा टेक-ऑफ लॉग (Take-off log) आणि एअरवर्थिनेस रिपोर्ट (Airworthiness Report) सध्या कुठे आहे? तो रिपोर्ट सार्वजनिक करण्यात यावा. 4. विमानाची रुटीन लाइन मेंटेनन्स (Routine line maintenance) झाली होती का? ती कोणी केली होती? तसेच हॅन्गरमधील सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे आणि ते उपलब्ध करून द्यावे. 5. विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स (Heavy base maintenance) झाला होता का? त्याचा अधिकृत रिपोर्ट काय सांगतो? या प्रश्नांमुळे अपघातामागील तांत्रिक बाबींची सखोल तपासणी होणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. घड्याळाचा भावनिक आणि पुराव्याचा संदर्भ पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार अत्यंत भावूक झाले. अजितदादा आता आपल्यात नसल्याचे सांगताना त्यांनी अजित पवारांच्या हातातील घड्याळाचा उल्लेख केला. अपघातानंतर सापडलेले ते जळालेल्या अवस्थेतील घड्याळ पाहूनच त्यांना खात्री पटली की, दादांचा खरोखर विमान अपघात झाला आणि ते आता आपल्याला सोडून गेले आहेत.हा केवळ अपघात नसून, त्यामागे तांत्रिक त्रुटी किंवा दुर्लक्ष असू शकते का, याची काटेकोर पडताळणी होणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माहिती गोळा करण्यामागील प्रेरणा रोहित पवार म्हणाले, “काही लोक आम्हाला विचारतील की, आम्ही ही सर्व तांत्रिक माहिती कुठून आणि कशी गोळा केली? आम्ही सध्या सत्तेत नसतानाही, अजितदादांवरील प्रेम आणि आदर यामुळे आम्ही ही माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि अजित पवार यांनी नेहमीच सत्य शोधण्याची आणि प्रयत्न करत राहण्याची शिकवण दिली आहे. त्याच प्रेरणेतून आम्ही ही माहिती लोकांसमोर आणली. लोकांना नेमके काय घडले हे कळले पाहिजे, हीच आमची भावना आहे.” या पत्रकार परिषदेनंतर अपघाताच्या तपासाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. विमान कंपनी, मेंटेनन्स रेकॉर्ड आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या ५ प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.