Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जात असताना हे विमान लँडिंगदरम्यान क्रॅश झाले. या अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, दिल्लीपासून गावपातळीपर्यंत राजकीय नेते आणि कार्यकर्ते श्रद्धांजली वाहत आहेत. जितेंद्र आव्हाडांची भावपूर्ण पोस्ट अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले कि, “महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला. प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही. शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत. पवार कुटुंबीयांच्या या दुःखद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत.” महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला.प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही.शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत.पवार… pic.twitter.com/uQNhtZWHsz — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 28, 2026 अपघाताचा घटनाक्रम अजित पवार मुंबईहून सकाळी सुमारे ८.१० वाजता खासगी चार्टर्ड Learjet 45 विमानाने (रजिस्ट्रेशन VT-SSK, VSR कंपनीचे) बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत होते, जिथे सकाळी दाट धुके होते. बारामती हे छोटे विमानतळ असून, त्याची धावपट्टी Table Top Runway प्रकारची आहे. येथे ILS (Instrument Landing System) सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे पायलटला मॅन्युअल पद्धतीने लँडिंग करावे लागते. एक्सपर्ट्स आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार: – पहिल्या लँडिंग प्रयत्नात विमान धावपट्टी दिसत नसल्याने अयशस्वी ठरले आणि ते पुन्हा आकाशात झेपावले. – दुसऱ्यांदा घिरटी घालून धावपट्टीचा अंदाज घेऊन लँडिंगचा प्रयत्न केला. – मात्र, विमान धावपट्टीवर थेट जाण्याऐवजी बाजूला गेले. जमीनीपासून सुमारे १०० फूट अंतरावर असताना विमानाचे संतुलन बिघडले. – पायलटने MAYDAY कॉल केला होता. – विमान धावपट्टीवर पोहोचण्याआधीच जमिनीला धडकले, त्यानंतर ४-५ मोठे स्फोट झाले आणि विमानाला भीषण आग लागली. विमान पूर्णपणे जळून खाक झाले. – अपघात सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० च्या दरम्यान घडला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, पण आगीच्या ज्वाळांमुळे कुणालाही वाचवता आले नाही. विमानात कोण-कोण होते? 1. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 2. पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) HC विदीप जाधव 3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 4. कॅप्टन संभवी पाठक (फर्स्ट ऑफिसर) 5. पिंकी माळी (फ्लाइट अटेंडंट)