Spam calls: दिल्लीनंतर सर्वाधिक स्पॅम कॉल आंध्र प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातून केले जातात; एअरटेल 8 अब्ज बनावट कॉलची ओळख पटवली

नवी दिल्ली – भारती एअरटेल कंपनीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून स्पॅम कॉल आणि मेसेज संदर्भात ग्राहकांना माहिती देणे सुरू केले आहे. गेल्या अडीच महिन्यापासून या कंपनीने 8 आठ अब्ज स्सॅम कॉल व 80 लाख स्पॅम एसएमएसची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यात आलेला आहे. दर दिवसाला साधारणपणे दहा लाख स्सॅम कॉल करणार्यांची ओळख पटविली जात आहे. दरम्यान एकूण स्पॅम कॉलमध्ये एअरटेल कंपनीच्या स्पॅम कॉलचा वाटा सहा टक्के आहे. तर एसएमएसचा वाटा दोन टक्के आहे.
दिल्लीत सर्वाधिक स्पॅम कॉल येतात आणि केले जातात. स्पॅम कॉल संदर्भात एअरटेल कंपनी संबंधित ग्राहकांना सूचना देते. त्यामुळे 12 टक्के ग्राहकांनी स्पॅम कॉल ओळखून ते उचलले नाहीत असे कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. बनावट कॉल करणार्या एकूण कॉलपैकी 35 टक्के कॉल लँडलाईन फोनवरून करण्यात आले आहेत.
दिल्लीनंतर सर्वाधिक स्पॅम कॉल आंध्र प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातून केले जातात. आणखी एक महत्त्वाची माहिती बाहेर आली आहे, ती म्हणजे एकूण स्पॅम कॉलपैकी 76% स्पॅम कॉल पुरुषांना केले जातात. एकूण कॉलपैकी 30 ते 60 टक्के वयोगटातील लोकांना 48% तर 26 ते 35 वयोगटातील लोकांना सव्वीस टक्के कॉल केले जातात.
ज्येष्ठ नागरिकांना फक्त सहा टक्के स्पॅम कॉल जातात. सकाळी नऊ वाजल्यापासून स्पॅम कॉल येण्यास सुरुवात होते. नंतर ते हळूहळू वाढत जातात. दुपारी बारा ते तीनच्या सुमारास सर्वाधिक स्पॅम कॉल केले जातात. सोमवार ते शनिवार दरम्यान जास्त बनावट कॉल केले जातात. रविवारी हे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी होते. 15 ते 20 हजार रुपये किमतीच्या मोबाईलवर एकूण कॉलच्या 22 टक्के कॉल केले जातात.





