मुंबई – बॉलीवूड अभिनेता राज कुमार राव याने सिनेक्षेत्रात स्वत: चे वेगळे स्थान निर्माण केला आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे लग्न पत्रलेखाशी झाले आहे. मात्र तिच्या आधी राज कुमार रावचे आणखी एका मुलीवर प्रेम होते. ज्यामुळे त्याला 25 मुलांकडून मारहाण देखील करण्यात आली होती. याबाबत त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत त्याने सांगितले की, “जेव्हा मी गुडगावच्या मॉडर्न फॅन्सी ब्लू बेल्स स्कूलमध्ये शिकत होता, तेव्हा मी एका मुलीला बास्केटबॉल खेळताना पाहिले आणि मी तिच्या प्रेमात पडलो. मग काही दिवसांनी माझी त्या मुलीशी मैत्री झाली आणि आम्ही डेटिंग करू लागलो. पण तेव्हा मला माहित नव्हते की त्या मुलीचा आधीच एक बॉयफ्रेंड आहे आणि जेव्हा त्या बॉयफ्रेंडला आमच्याबद्दल कळले, तेव्हा त्याने 25 मुलांना आणले आणि मला मारहाण केली.”
दरम्यान राजकुमार रावने 2010 मध्ये ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले, परंतु ‘गँग्स ऑफ वासेपूर-भाग 2’ आणि ‘तलाश: द आन्सर लाईज विदिन’ मधील सहाय्यक भूमिकांद्वारे ओळख मिळवली. त्याने ‘काई पो चे’, ‘शाहिद’, ‘क्वीन’, ‘बरेली की बर्फी’, ‘अलिगढ’, ‘लुडो’, ‘न्यूटन’, ‘द व्हाइट टायगर’ आणि ‘स्त्री’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारला ‘शाहिद’साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.