Abhishek Ghosalkar funeral – दहिसरच्या तरुण नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला. तीन गोळ्या लागलेल्या घोसाळकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिस नरोन्हा यानेही गोळ्या झाडून घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.
घोसाळकर यांच्या पार्थिवावर आज दहिसर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत घोसाळकर कुटुंबियांच्या घरी पोहोचले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते याठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. अभिषेक घोसाळकर हे दहिसरचे माजी नगरसेवक होते. त्यांचे वडील विनोद घोसाळकर हे देखील ठाकरे गटाचे नेते आहेत. दहिसरच्या तरुण नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
पत्नी, आई अन् मुलीने हंबरडा फोडला | Abhishek Ghosalkar funeral
गोळीबाराच्या घटनेत जीव गमवावा लागलेल्या अभिषेक यांच्या कुटुंबियांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. घोसाळकर यांच्या पत्नी आई व मुलगी ओक्सबोक्शी रडतानाची दृश्यं हृदय पिळवटून टाकणारी आहेत.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर? | Abhishek Ghosalkar funeral
अभिषेक घोसाळकर (४०), हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत.
अभिषेक घोसाळकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकही होते.
अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.
अभिषेक घोसाळकर यांचा २०१३ मध्ये तेजस्वी दरेकर यांच्यासोबत विवाह झाला.
घोसाळकर आणि नरोन्हाचे वैर | Abhishek Ghosalkar funeral
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा यांच्यात “वैयक्तिक शत्रुत्व” होते परंतु आयसी कॉलनी परिसराच्या सुधारणेसाठी ते एकत्र आले होते हे स्पष्ट करण्यासाठी फेसबुक लाईव्हची व्यवस्था करण्यात आली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी एका पोस्टमध्ये गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे नोरोन्हा यांची भेट घेतली होती आणि त्यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याचे निमंत्रण दिले होते.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोळीबार होण्यापूर्वी अभिषेक घोसाळकर यांची भेट घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्रात आता कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा दावा त्यांनी केला.