Abhijit Deepke : सरकारची झोप उडणार? अभिजीत दीपके पुन्हा रस्त्यावर उतरणार; ५ सप्टेंबरला दिल्लीत मोठ्या आंदोलनाची घोषणा
Abhijit Deepke : विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून CJP (सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.

Abhijit Deepke : विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत मोठ्या शांततापूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर यापूर्वी झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा दावा त्यांनी केला आहे. (Abhijit Deepke)
विद्यार्थ्यांना दिलेली आश्वासने अद्याप अपूर्ण
अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी आंदोलनाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर २५ जुलै रोजी सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना काही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, अद्याप या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. (Abhijit Deepke)
तसेच, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दीपके यांनी सांगितले. (Abhijit Deepke)
‘सरकार कोर्टाकडे बोट दाखवतंय’
विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार आणि न्यायालयाकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला. “सरकार म्हणतंय की कोर्टामुळे आम्हाला हे करता येत नाही. मात्र कोर्ट म्हणतंय की आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त यादी द्या. सरकार मात्र यादी देत नाही,” असा दावा त्यांनी केला. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Abhijit Deepke)
जंतरमंतरपेक्षाही मोठ्या आंदोलनाचा दावा
यापूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना काही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, ती अद्याप पूर्ण झाली नसल्याने आता त्यापेक्षा मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे दीपके यांनी सांगितले. या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येण्याची शक्यता आहे. (Abhijit Deepke)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य
दरम्यान, पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ का आली? एखादी व्यक्ती आंदोलन करते, तेव्हा तो त्याच्यासमोरचा शेवटचा पर्याय असतो,” असे त्यांनी म्हटले. (Abhijit Deepke)
सरकारने समाजातील मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, तर मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ आली असती का, असा सवालही दीपके यांनी उपस्थित केला. (Abhijit Deepke)
Abhijit Deepke : सरकारी शाळेत मुदत संपलेली खाद्यपदार्थांची पाकिटे; सीजेपीचे अभिजित दिपके यांचा दावा




