‘राहुल-प्रियंका गांधी अल्पसंख्याक जातीयवादी शक्तींच्या पाठिंब्याने…’ ; सीपीआयएमच्या ‘या’ बड्या नेत्याचा आरोप

A Vijayaraghavan । वायनाडमध्ये अल्पसंख्याक सांप्रदायिक शक्तींच्या पाठिंब्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी विजयी झाल्याचा आरोप सीपीआय(एम) पॉलिटब्युरो सदस्य ए विजयराघवन यांनी केला आहे. मुस्लिम जातीय आघाडीच्या भक्कम पाठिंब्याशिवाय राहुल गांधी जिंकू शकतील का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
“राहुल गांधी कोणाच्या पाठिंब्याने दिल्लीत पोहोचले?” A Vijayaraghavan ।
विजयराघवन वायनाडमधील बथेरी याठिकाणी सीपीआयएम वायनाड पक्षाच्या अधिवेशनाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, “आता वायनाडमधून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोन लोक जिंकले आहेत. राहुल गांधी कोणाच्या पाठिंब्याने दिल्लीत पोहोचले? मुस्लिम जातीय आघाडीच्या भक्कम पाठिंब्याशिवाय ते जिंकू शकले असते का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला तसेच ‘ते विरोधी पक्षनेते आहेत, ते काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत.असेही त्यांनी यावेळी म्हटले.
त्यांच्या रॅलीमध्ये समोर आणि मागे कोण होते? A Vijayaraghavan ।
पुढे त्यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांच्याविषयी बोलताना,”प्रियंका गांधी यांनीही याठिकाणावरून निवडणूक लढवली होती. त्यांच्या रॅलीमध्ये समोर आणि मागे कोण होते? त्या अल्पसंख्याक जातीयवादी शक्तींचे सर्वात अतिरेकी घटक होते, त्या आता काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व आहेत. जेव्हा ईएमएस (केरळचे पहिले मुख्यमंत्री) निवडणूक लढवत होते, तेव्हा केंद्रीय मंत्री त्यांचा पराभव करण्यासाठी येथे आले होते.
विजयराघवन यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की जेव्हा अमित शहा यांनी आंबेडकरांचा अपमान केला होता तेव्हा पिनाराई विजयन यांनी सर्वप्रथम प्रतिक्रिया द्यायला हवी होती, परंतु त्यांच्या पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य अशी विधाने करत आहेत.
केरळचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पिनाराई विजयन यांनी एका राजकीय वक्तव्यात प्रियांका गांधी जमात-ए-इस्लामीसारख्या संघटनेच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत असल्याचा दावा केला होता, हे विधान आहे. केरळमधील राजकीय घटनांशी संबंधित आणि हे काँग्रेस विरुद्ध डाव्या पक्षांमधील कडव्या स्पर्धेच्या संदर्भात दिले गेले.
केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्या आघाडीतील (एलडीएफ) राजकीय तणाव शिगेला पोहोचला असताना विजयन यांचे हे वक्तव्य आले आहे, त्यांनी काँग्रेस आणि जमात-ए-इस्लामी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, काँग्रेसने विजयन यांचे हे विधान फेटाळून लावत ते पूर्णपणे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. डाव्या आघाडीने लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे पक्षाने म्हटले आहे.





