मुंबई : छोट्या पडद्यावरील हिंदी बिग बॉस 16 चा रिअॅलिटी शो अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या हा शो घरातील स्पर्धकांच्या भोवऱ्यात सापडला आहे. बिग बॉस 16 हा रिअॅलिटी शो स्पर्धकांमुळे वादात सापडला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने शोच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.
आयोगाने म्हटले आहे की, बिग बॉस 16 च्या एका एपिसोडमध्ये विकास मनकतलाने अर्चना गौतमवर जातीवाचक शब्द वापरले, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. एका वृत्तसंस्थेने या संदर्भात एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने बिग बॉसमधील आणखी एक स्पर्धक अर्चना गौतम, विकास मनकतला यांना ‘खालच्या जातीचे लोक’ म्हटले आहे. जे अनुसूचित जातीचे उल्लंघन आहे. अनुसूचित जमाती कायद्यानुसार हा गुन्हा आहे. आयोगाने या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त, वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, एंडेमोल प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांना नोटीस बजावली आहे.
National Commission for Scheduled Castes issued notice to Mumbai CP, Viacom 18 Media Pvt Ltd, Endemol India Pvt Ltd &others after a Bigg Boss contestant Vikas Manaktala called another contestant Archana Gautam “Neech jati ke log” which is offence punishable under SC/ ST act: NCSC pic.twitter.com/D0U2u0xeQD
— ANI (@ANI) December 29, 2022
रिअॅलिटी शो बिग बॉसच्या बुधवारच्या एपिसोडमध्ये विकास मनकतलाने अर्चना गौतमला ‘खालच्या जातीची व्यक्ती’ म्हटले होते. भारतीय पॅनेल संहितेनुसार, NCSC ने म्हटले आहे की, हा स्पष्टपणे SC/ST कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा आहे आणि आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम 338 अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राइबने शोच्या प्रोडक्शन कंपन्यांना या प्रकरणी सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. बरोबरच या प्रकरणी केलेल्या कारवाईचीही माहिती देण्यास सांगितले आहे.