१० मिनिटं अंधाधुंद गोळीबार….१२ तास जखमींना बंदी…; जालियनवाला बाग हत्याकांडची थरकाप उडवणारी कहाणी, केसरी 2 चा टीझर रिलीज

kasari 2 teasar | बॅालीवूडचा खिलाडी कुमार अक्षयच्या कुसरी 2 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी अक्षयच्या केसरी या सिनेमाच भरभरून कौतुक केले होतं. यानंतर आता केसरी 2 रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या पहिला भागाची कथा ही सारागढी येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धाच्या सत्यकथेवर आधारित होती. ज्यामध्ये २१ शिख धर्मियांनी इंग्रजांनशी लढा दिला होता. या सिनेमात अक्षय शूर हवालदार ईशर सिंगची भूमिका साकारली होती. केसरी 2 मध्ये अक्षयने शंकरन नायर या वकिलाच्या भूमिका साकारलेली आहे. या सिनेमाची कथा जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित आहे. हा सिनेमा 18 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
KESARI Chapter 2 चा टीझर 1 मिनिट 39 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये पहिल्या 30 सेकंदात फक्त भीषण हत्याकांडाचा आवाज ऐकू येतो, जो तुम्हाला थक्क करणारा आहे. टीझरमध्ये 1919 साल हा काळ दाखवण्यात आला आहे. जालियनवाला बागेत इंग्रजांनी 10 मिनिटं एकसारखा गोळीबार केला होता. तर जखमींना 12 तास बागेत कोंडून ठेवलं होतं, जेणेकरून गिधाडे त्यांना खाऊ शकतील, इतक्या क्रूर पद्धतीने जालियनवाला बाग हत्याकांड इंग्रजांनी घडवून आणलं होतं. याचीच थरकाप उडवणारी कहाणी या सिनेमात दाखविण्यात आली आहे. अक्षयने या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारलेली आहे.
कोण आहेत सर चेत्तूर शंकरन नायर?
सर चेत्तूर शंकरन नायर हे एक भारतीय वकील आणि राजकारणी होते. भारतातील शिक्षण मंत्री, 1906 ते 1908 पर्यंत मद्रासचे महाधिवक्ता, 1908 ते 1915 पर्यंत मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून 1906 ते 1915 पर्यंत काम केले होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यातही महत्वाची भूमिका बजावली होती. या सिनेमात आर माधवन, अनन्या पांडे यांच्याही भूमिका आहेत. तर सिनेमाचे दिग्दर्शक करण सिंग त्यागी हे आहेत.
जालियनवाला बाग हत्याकांड कसे झाले?
अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ एक छोटीशी बाग होती. येथे 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड एडवर्ड डायर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सैन्याने नि:शस्त्र लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. जालियनवाला बागेतील या हत्याकांडात शेकडो मुले, वृद्ध, महिला आणि पुरुष मारले गेले होते. तर हजारो लोक जखमी झाले होते. 10 मिनिटांत एकूण 1650 गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जाते, ज्याच्या खुणा आजही तेथे आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ही एक प्रमुख घटना होती.




