Sahil Goyal : 10 तास चौकशी! सख्या भावाने पोलिसांनी दिली महत्वाची माहिती; सियाच्या ‘त्या’ दाव्यावर साहिल काय म्हणाला?
Sahil Goyal : पोलिसांना सियाने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, हे कुटुंबीयांना आणि त्यालाही सांगितल्याचा दावा केला होता.

Sahil Goyal : केतन अग्रवाल प्रकरणाची जी काही माहिती समोर येत आहे, त्यामुळे हे प्रकरण किती भयानक हे लक्षात येते. सुरूवातीला वाटणारा अपघात आणि त्यानंतर समोर आलेला हत्येचा कट. हे सर्व एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशाच प्रकारचं आहे. पोलिसांकडून आता दोन्ही कुटुंबाचे जबाब घेतले जात आहेत. काल पोलिसांनी आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलची तब्बल १० तास चौकशी केली. या चौकशीत त्याने सियाने केलेल्या एका दाव्यावर आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे. (Sahil Goyal )
पोलिसांना सियाने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, हे कुटुंबीयांना आणि त्यालाही सांगितल्याचा दावा केला होता. या दाव्यावर तिचा भाऊ साहिलने पोलिसांना केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं, असं सांगितलं आहे. त्यामुळे मग सियाचा दावा खरा की खोटा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साहिल म्हणाला की, सियानं मला किंवा कुटुंबीयांना काहीही सांगितलं नाही, सियानं सांगितलं असतं तर कुटुंबीयांनी तिचं लग्न लावलं नसतं. या माहितीनंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
हेही वाचा : Pakistan Earthquake: पाकिस्तान पुन्हा हादरला! 5.4 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने उडाली नागरिकांची झोप
सियाची चेतनसोबत पहिली भेट कधी झाली? (Sahil Goyal )
सियाचे आणि चेतनचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांची पहिली भेट कधी झाली याबाबत माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतनची पहिली भेट क्रिकेट सामन्यांदरम्यान झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळायचे. साहिलसोबत सिया सामने पाहण्यासाठी गेली असता तिची चेतनशी ओळख झाली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली आणि हीच भेट नंतर मैत्री आणि पुढे प्रेमात रुपांतरित झाली.
सियाला ‘या’ गोष्टी खटकायच्या (Sahil Goyal )
सिया ही मनाने केतनसोबत लग्न करण्यासाठी तयार नव्हती. लग्नासाठी कुटुंबीयांनी मोठी तयारी केली होती. मात्र, सियाला केतन आवडत नव्हता. त्याच्या दोन गोष्टी तिला सतत खटकायच्या. एक म्हणजे केतनला टक्कल होते. तो केसांचा टोप वापरत होता. दुसरी म्हणजे केतन बोलताना अडखळायचा. लग्न ठरवताना या गोष्टींची पूर्वकल्पना सियाला आणि गोयल कुटुंबाला होती.






