नवी दिल्ली – केंद्रात आणि देशातील निम्याहून अधिक राज्यात भाजपचे सरकार आहे, त्याच बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, महामंडळे, ग्रामपंचायत यावर देखील भाजपचे सरकार आहे. यामध्ये त्यांनी 2022मध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर दिल्ली जिंकण्याची रणनीती आखण्यासाठी भाजपकडून दोन दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे.
परंतु आपच्या सब्सिडीयुक्त वीज आणि मोफत पाणी यासारख्या सुविधांचा या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, उत्तर दिल्ली महानगरपालिका, दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका या तिन्ही पालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे.
दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश कुमार गुप्ता, राज्याचे प्रभारी सरचिटणीस आणि सह-प्रभारी बैजयंत पांडा यांच्या व्यतिरिक्त तिन्ही आमदार, सात खासदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश बिधुरी, काही माजी भाजप अध्यक्ष आणि पक्षाचे एक किंवा दोन वरिष्ठ नेते हरिद्वारमध्ये होणाऱ्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भाजपच्या दिल्ली युनिटचे वरिष्ठ नेते 23 ऑगस्टपासून हरिद्वार येथे दोन दिवसीय ‘चिंतन शिबिर’ मध्ये उपस्थित राहतील. तिथे नगरपालिका निवडणुका आणि दिल्लीतील एकूण राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे, असं भाजप पदाधिकाऱ्याने सांगितलं.
गेल्या काही वर्षात दिल्लीतील राजकीय परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास करून भाजपला त्या अनुषंगाने धोरणात बदल करण्याची आवश्यकता आहे. तसेच अरविंद केजरीवाल सरकारचा सामना करण्यासाठी योग्य रणनीती आखण्याची गरज असल्याचं या पदाधिकाऱ्याने समाज माध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजपची दिल्लीतील कामगिरी..
2013च्या दिल्ली विधानसभामध्ये भाजप 70 पैकी 32 जागा जिंकल्या,दिल्लीतील सर्वात मोठा पक्ष ठरला
आप पहिल्यांदाच मैदानात उतरत 28जागा जिंकल्या
दिललीत पुन्हा 2015 मध्ये निवडणुका झाल्या. यावेळी आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागा
2020 च्या निवडणुकीत आपने 62 जागा पुन्हा जिंकल्या