Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कथित पाकिस्तान संबंधांवरून गौरव गोगोईंवर हल्ला केल्याबद्दल टीका केली आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मुलांना त्यात ओढणे हे चुकीचे राजकारण आहे, असे प्रतिपादन केले. गुवाहाटीजवळ सोनापूर येथील झुबीन गर्ग यांच्या स्मशानभूमी जुबीन खेत्रा येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर, वड्रा म्हणाल्या की, हा गायक राजकारणाच्या पलीकडे होता आणि त्यांनी आयुष्यभर प्रेमाचा संदेश दिला. प्रियांका गांधी-वड्रा म्हणाल्या की, राजकारणात दोन प्रकारचे नेते असतात – एक जो सकारात्मक राजकारण करतो आणि दुसरा जो ध्रुवीकरण करतो. गौरव गोगोई प्रेमाचे राजकारण करत आहेत. त्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोप मुख्यमंत्री हेमंत विस्वा शर्मा म्हणत आहेत. या प्रकरणामध्ये ते गोगोई यांच्या मुलांचाही समावेश करत आहेत. गोगोई सकारात्मक व्यक्ती असूनही त्यांच्यावर असे हल्ले होत आहेत. आसाममधील लोकांना हे समजते. परंतु गौरव आणि त्यांच्या कुटुंबावरील हल्ले चुकीचे राजकारण आहे. कोणीही राजकीय नेत्याच्या कुटुंबावर आणि मुलांवर हल्ला करू नये. वायनाडच्या खासदार असलेल्या प्रियांका गांधी-वड्रा म्हणाल्या की, यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर शोधले पाहिजे.