Dharmendra: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र जरी आता हयात नसले, तरी त्यांची सादगी, त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या मनातील माणुसकी आजही सहकलाकारांच्या आणि चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहे. धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित अनेक आठवणी सध्या त्यांच्या सहकलाकारांकडून शेअर केल्या जात आहेत. त्यातच अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही काही खास आणि मनाला भिडणारे किस्से सांगितले. “धर्मेंद्र कधीच बदलले नाहीत” – शर्मिला टागोर शर्मिला म्हणाल्या की, त्या धर्मेंद्र यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासून ओळखतात. “स्टारडम येण्यापूर्वी असो किंवा त्यानंतर… धर्मेंद्र कधीच बदलले नाहीत. ते प्रत्येकाशी सारख्याच प्रेमाने वागायचे. मी त्यांना अनेकदा रस्त्यावर अनोळखी व्यक्तीला मिठी मारताना पाहिले आहे. त्यांच्यात कधीही स्टारसारखा अॅटिट्यूड नव्हता. ते अतिशय सौम्य, साधे आणि विनम्र होते,” असे त्या म्हणाल्या. एक खास किस्सा : शर्मिलाच्या विनंतीवर रातभर शूटिंग धर्मेंद्र यांच्या समर्पणाची आठवण देत शर्मिलांनी एक सुंदर किस्सा सांगितला. त्या दिवसांत शर्मिला सलग डबल शिफ्ट करत होत्या. सकाळी ७ ते दुपारी २ आणि पुन्हा दुपारी २ ते रात्री १०. त्या ‘ मेरे हमदम मेरे दोस्त’च्या शूटिंगमध्ये होत्या. एका गाण्याचे चित्रीकरण चालू होते. पण रात्री १० वाजेपर्यंतही शूट पूर्ण झाले नाही. डायरेक्टरने दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. परंतु शर्मिलांची पुढील दिवशी दुसरी शिफ्ट आणि त्यानंतर फ्लाइटची योजना असल्याने त्यांना ती वेळ मिळू शकत नव्हती. त्यांनी मग धर्मेंद्र यांना विनंती केली की शक्य असल्यास शूट रात्रीच पूर्ण करता येईल का? धर्मेंद्रची तत्काळ तयारी धर्मेंद्र यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. शर्मिला म्हणतात, “आम्ही रात्रीभर सकाळी ६ वाजेपर्यंत शूटिंग केले. धरमजी मध्येच थोडे विश्रांती घेत पण त्यांनी एकदाही तक्रार केली नाही. ते खूपच गोड आणि सहकार्य करणारे होते. त्यांचे हे वागणे मी कधीच विसरणार नाही. मला वाटत नाही की कोणी इतके सहकार्यशील असू शकेल.” धर्मेंद्र यांचे प्रेमळ संबोधन शर्मिला सांगतात की धर्मेंद्र त्यांना प्रेमाने ‘रिंकू’ म्हणायचे. “ते म्हणायचे, ‘हम आपसे बहुत प्यार करते हैं, मगर हमें सोना भी जरूरी है’,” असे त्या हसत म्हणाल्या. धर्मेंद्रचे असामान्य व्यक्तिमत्व शर्मिला टागोर यांनी सांगितलेल्या या आठवणी स्पष्ट करतात की धर्मेंद्र हे फक्त एक सुपरस्टार नव्हते, तर मनापासून सहकार्य करणारे, जमिनीवर पाय ठेवून जगणारे आणि माणुसकी जपणारे एक असाधारण व्यक्तिमत्त्व होते.