Pune ZP Election – केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात मूलभूत समस्या सोडवून विकास करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी केला असून नागरिकांकडून विकासाच्या भूमिकेला पाठिंबा मिळू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विश्वासास पात्र असलेल्या शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेखा रमेश हरगुडे, पंचायत समिती गण केसनंद वाडेबोल्हाई राष्ट्रवादीकडून प्रमोद चंद्रकांत हरगुडे, पंचायत समिती हवेली कोरेगाव मूळ या गणातून कृषिराज दत्तात्रेय चौधरी या तिन्ही उमेदवारांनी पदयात्रा, नागरिकांशी थेट संवाद, नागरिकांच्या समस्या समजून घेत ते सोडवण्याचे आश्वासन, आदींमुळे केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही उमेदवारांची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्याचा विकास पुरुष राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावोगावी आयोजित केलेल्या शोकसभांना उपस्थित राहून त्यांच्या कार्याचे स्मरण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार साधेपणाने प्रचार करू लागले आहे. उमेदवारांकडून साधेपणाने आयोजित केलेल्या आशीर्वाद यात्रांना मोठा सहभाग नोंदवत महिला, नागरिकांकडून, तरुणांकडून मोठा पाठिंबा मिळू लागला असल्याचे केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रमोद हरगुडे यांनी सांगितले आहे.वैयक्तिक स्तरावरील मदत सहकार्य व केलेली कामे व नागरिकांसाठी आयोजित केलेल्या विविध सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांबाबत सकारात्मक प्रतिसाद लाभत असून हा प्रतिसाद ऊर्जा देणारा ठरू लागला आहे असल्याचे कोरेगाव मूळ पंचायत समिती गणाचे उमेदवार कृषीराज चौधरी यांनी सांगितले. “केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांना मजबूत व पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही उमेदवारांची भूमिका ही विकासात्मक असून नागरिकांकडून या विकासात्मक भूमिकेचे स्वागत केले जात आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करून आगामी काळात विकासाचा आलेख वाढवणार आहे.” – प्रमोद हरगुडे, केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे उमेदवार