Smriti Mandhana : टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू आणि वर्ल्ड विजेती खेळाडू स्मृती मानधना हिने काही दिवसांपूर्वी म्युझिक कंपोझर पलाश मुच्छलसोबत लग्न तुटल्याचं जाहीर केल्यानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे. ती पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. मैदानात उतरून सराव करताना दिसत आहे. यावेळी तिने भारताची कर्णधार हरमनप्रीतची गळाभेटही घेतली होती.त्यामुळे लग्न तुटल्याच्या घटनेनंतर ती पहिल्यांदा माध्यमांसमोर आली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 23 नोव्हेंबर 2025 ला स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार होतं. मात्र लग्नाला काही तास उरले असताना अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्टअटॅक आल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं.या सगळ्या घटनाक्रमा दरम्यान अनेक घडामोडी घडल्या. पलाश मुच्छल याचे दुसऱ्या मुलीसोबतचे सिक्रेट चार्ट यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच दोघे पुन्हा 7 तारखेला लग्नबंधनात अडकतील अशी देखील माहिती समोर आली होती. पण तब्बल 14 दिवसानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्मृती मानधनाने पलाश मुच्छलसोबत लग्न तुटल्याची माहिती दिली होती. तिच्या पोस्टनंतर पलाशने देखील लग्न तुटल्याची पोस्ट शेअर केली होती. Captain and Vice Captain in the town @mandhana_smriti and @ImHarmanpreet met after World Cup winning days . pic.twitter.com/Z81jRFtbjM — vipul kashyap (@kashyapvipul) December 10, 2025 या घटनेनंतर स्मृती मानधना पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. स्मृती मानधनाच आज राजधानी दिल्लीला पोहोचली होती. इथे एका ठिकाणी तिची भेट कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिच्या मॅनेजरसोबत झाली होती.यावेळी स्मृतीने हरमनप्रीतला पाहून स्मितहास्य केलं आणि तिची गळाभेट घेतली होती. या दोघीजण ॲमेझॉनच्या संभव समिटला आल्या होत्या. या ठिकाणीच त्यांची भेट झाली. क्रिकेटपेक्षा दुसरे कशावर प्रेम नाही “मला वाटत नाही की क्रिकेटपेक्षा मला दुसरे काहीही आवडते. भारताची जर्सी घालणे ही सर्वात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरी, हा एक विचार तुम्हाला सर्वकाही रोखण्यास मदत करतो, असे स्मृती मानधना या कार्यक्रमात बोलली आहे.तसेच “फलंदाजीचे वेड नेहमीच होते. माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते खरोखर समजले नाही, परंतु माझ्या डोक्यात मला फक्त एकच गोष्ट हवी होती – विश्वविजेता म्हणून ओळखले जावे असे ती म्हणाले. “ही ट्रॉफी आमच्या संघर्षाचे फलित होती. मी एका दशकाहून अधिक काळ खेळलो आहे आणि बऱ्याचदा गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत. अंतिम सामन्यापूर्वी आम्ही तो क्षण पुन्हा पुन्हा चित्रित केला. जेव्हा तो अखेर पडद्यावर दिसला तेव्हा त्याने खरोखरच आमचे डोळे भरून आले. तो प्रत्येक प्रकारे भावनिक होता.” असे स्मृती यावेळी म्हणाली.