YS Sharmila joined Congress : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय एस शर्मिला यांनी अखेर आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर वायएस शर्मिला म्हणाल्या, “आज वायएसआर तेलंगणा पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करताना मला खूप आनंद होत आहे. वायएसआर तेलंगणा पक्ष आजपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा भाग होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. काँग्रेस पक्ष आजही आपल्या देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे,”असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते, त्यासाठी मी काम करेन याचा मला आनंद आहे, असे शर्मिला म्हणाली.यावेळी बोलताना त्यांनी मणिपूर हिंसाचाराविषयी दुःख व्यक्त करत धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत नसेल तर हेच होईल,” असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.
#WATCH दिल्ली: YSR तेलंगाना पार्टी की अध्यक्ष और आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री वाई.एस. जगन मोहन रेड्डी की बहन वाई.एस. शर्मिला कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे और सांसद राहुल गांधी की मौजूदगी में कांग्रेस में शामिल हुईं। pic.twitter.com/v2XzBSRNEV
— ANI_HindiNews (@AHindinews) January 4, 2024
वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचे काका, वायएसआरसीपीचे माजी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांना बहीण वायएस शर्मिला यांची समजूत काढण्यासाठी पाठवले होते परंतु चर्चा अयशस्वी झाली. “31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी झालेल्या मीटिंगमध्ये शर्मिला यांनी वायएसआरसीपीमध्ये सामील होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता,” असे सूत्रांनी म्हटले होते.
दरम्यान, वायएस शर्मिला या तेलंगणाचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या धाकट्या बहीण आणि दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी, अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या कन्या आहेत. शर्मिला यांनी तेलंगणामध्ये स्वतःची संघटना स्थापन केल्यानंतर जुलै 2021 मध्ये भाऊ-बहीण जोडीने राजकीयदृष्ट्या वेगळे झाले होते. वायएसआरसीपी आणि वायएसआरटीपी या दोन्ही पक्षांची स्थापना वायएसआरचा वारसा पुढे नेण्याच्या आणि वायएसआरचे शासन परत आणण्याच्या उद्देशाने करण्यात आली. असे मानले जाते की वायएस शर्मिला राजकीय स्थानासाठी धडपड करत होत्या मात्र जगन रेड्डी यांनी वायएसआरचा वारसा हायजॅक केला आहे त्यामुळे त्यांनी भावापासून वेगळी वाट धरण्याचा मार्ग निवडला असल्याचे म्हटले जात आहे.