राजेगाव – वाघोली (पुणे) येथील एचपीसी एमबेडेड टेक कंपनीतील युवकांतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि युवादिानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियानात कंपनीचे डायरेक्टर हरिश चतार, इंजिनियर सागर वाकळे, प्रिंतेश उमाटे, ज्ञानेश्वर यादव,अमर सरोदे, अविनाश बोंगाणे, राजेश्वर देशमुख, भगवान देशमुख, वैभव बिराजदार, नंदकिशोर नागराळे, अजय डांगे, स्वप्नील चव्हाण, कार्तिक घायवट, शैलेश पवार या युवकांनी भाग घेतला होता.
सध्या स्वच्छता अभियान राज्यभर राबवले जात असून, या माध्यमातून अनेक गावे चकाचक करण्यात येत आहेत. हा उपक्रम गावोगावी राबवून ग्रामस्थांना स्वच्छतेचे धडे देण्यात येत आहेत, त्यामुळे मोठ्यांपासून लहानांपर्यंतचा या अभियानात सहभाग दिसून येत आहे.
त्यामुळे स्वच्छतेला महत्त्व देऊन सर्वांनीच पुढाकार घेण्याचे आव्हान एचपीसी एमबेडेड टेक कंपनीने केले. हे अभियान या कंपनीचे डायरेक्टर हरीश चतार यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.