मुंबई: “२०१४ साली लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मोठे यश मिळाले मात्र नंतर दिल्लीत मोदींचा दणाणून पराभव झाला. आपल्या राज्यात ही परिस्थिती तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागेल, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आदरणीय पवारसाहेब या वयातही महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. पवार साहेबांची प्रेरणा घेऊन तरुणांनी देखील आक्रमक होण्याची गरज आहे, असे वक्तव्य अजित पवारांनी केले.
रोजगाराचा,कायदा-सुव्यवस्थेचा,ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे.पण त्यावर कुणी बोलायला तयार नाही.मेक इन इंडिया चा ‘बब्बर शेर’ आता ‘नामशेष’ झाला आहे. स्किल इंडिया’ची अवस्था ईल इंडिया बनली आहे. म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरुणांसाठी आवाज उठवला पाहिजे, असेही पवार म्हणाले.