Aditi Rao Hydari : बॅालीवूडमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं; गांधी टॅाक्समधील प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केले मत
Aditi Rao Hydari : अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने गांधी टॅाक्स चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत दिली.

Aditi Rao Hydari : बॅालीवूड इंडस्ट्रीत आता प्रयोगशील चित्रपट तयार केले जात आहेत. खरंतर चित्रपट ही चित्रभाषा आहे, चित्रपटाला कोणत्या भाषेचे बंधन नाही. सुरुवातीच्या काळात केवळ चलचित्र म्हणजे चित्रपट असायचा. त्यामुळे चित्रपटात भाषा नव्हती. त्यास मुकपट म्हटले जाते. आता पुन्हा एकदा ‘गांधी टॅाक्स’ नावाचा मुकपट प्रदर्शित झाला आहे.
सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून, चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने गांधी टॅाक्सच्या निमित्ताने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चित्रपट आणि बॅालीवूड इंडस्ट्रीविषयी मनमुराद गप्पा मारल्या. प्रत्येक चित्रपटात स्वतःला सिद्ध करावे लागते, असे स्पष्ट मत आदितीने व्यक्त केले. गांधी टॅाक्स चित्रपटाविषयी बोलताना काहीही न बोलता तुमच्या भावना व्यक्त करण्याची ही प्रक्रिया मला खूप आवडत असल्याचे आदिती म्हणाली.
मूकपटात काम करणे हे माझे नेहमीच स्वप्न होते. जेव्हा गांधी टॉक्स माझ्याकडे आला तेव्हा मी खरोखरच रोमांचित झाले. चित्रपटाच्या टीमने ते आणखी मनोरंजक बनवले. चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर बेलेकरांनी ज्या पद्धतीने त्याची रचना केली ती कौतुकास्पद असल्याचे आदित्य म्हणाली. गांधी टॅाक्स चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजयसेतूपतीची मुख्य भूमिका आहे. त्याशिवाय इतर कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
तसेच एक कलाकार म्हणून प्रत्येक चित्रपट स्वतःला आव्हान देणारा असतो, परंतू मूकपटाची आव्हाने अद्वितीय असतात. त्यात कोणतेही संवाद नसतात. सर्व काही तुमच्या देहबोलीवर तुमच्या डोळ्यांवर आणि तुम्हाला आत काय वाटते यावर अवलंबून असते, असे मत आदितीने व्यक्त केले. काहीही न बोलता तुमच्या भावना व्यक्त करण्याची ही प्रक्रिया मला खूप आवडते. असे देखील ती म्हणाली.
बॅालीवूड इंडस्ट्रीविषयी अभिनेत्री स्पष्टचं बोलली
बॅालीवूड इंडस्ट्रीविषयी बोलताना आदितीने महत्वाचे विधान केले. जर मला चांगले काम मिळाले तरच मी हिंदी चित्रपट करेन, असे तिने स्पष्टपणे सांगितले. ती म्हणाली, खरंतर आमच्यासारख्या बाहेरून बॉलीवूडमध्ये येणाऱ्या लोकांना प्रत्येक चित्रपटात स्वतःला सिद्ध करावे लागते आणि मी हे कोणत्याही तक्रारी किंवा नकारात्मकतेशिवाय सांगते. मी २०११ पासून बॅालीवूडमध्ये काम करत आहे, देशातील काही हुशार दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यवान असल्याचे आदितीने सांगितले.
हेही वाचा : Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश; ५१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण





