नवी दिल्ली- कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. बजरंग पुनियाने लिहिले की, मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. अडीच पानांच्या या पत्रात बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघावर (डब्ल्यूएफआय) ब्रिजभूषणच्या निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयाला विरोध केला आहे.
बजरंग हा पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला होता, पण आत जाण्याची परवानगी न मिळाल्याने त्याने तो पुरस्कार तिथेच फूटपाथवर ठेवला.
स्वत:ला ‘अपमानित पैलवान’ म्हणवून घेणारा बजरंग म्हणाला की, महिला कुस्तीपटूंचा अपमान केल्यानंतर मी सन्माननीय जीवन जगू शकणार नाही, म्हणून मी माझा सन्मान परत करत आहे. आता मी या सन्मानाच्या ओझ्याखाली जगू शकत नाही. बजरंग पुनियाला १२ मार्च २०१९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बजरंगच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे…
सरकारने ठोस कारवाईची चर्चा केली होती; म्हणून अंदोलन मागे घेतले
३ महिन्यांत काही झाले नाही, म्हणून पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले
बृजभूषण यांच्या दबावाखाली १२ महिला कुस्तीपटूंनी माघार घेतली
आम्हा सर्वांवर खूप दबाव होता. आमच्या निषेध स्थळाची तोडफोड करण्यात आली
गृहमंत्र्यांनीही आम्हाला न्याय देण्याचे अश्वासन दिले होते