नवी दिल्ली – राष्ट्रीय पातळीवरील कामगारांच्या दहा संघटनांनी केंद्र सरकारच्या व्यापार धोरणाविरोधात राष्ट्रीय पातळीवर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
9 ऑगस्ट रोजी भारतात छोडो भारत हा दिवस पाळला जातो. त्यादिवशी सेव्ह इंडिया डे पाळण्यात येणार आहे. यादिवशी देशभर कामगार सत्याग्रह आणि जेलभरो आंदोलन करणार आहेत. देशात केंद्रीय पातळीवर 12 कामगार संघटना आहेत. त्यातील 10 कामगार संघटनांनी हे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये आयटक, इंटक इत्यादी कामगार संघटनांचा समावेश आहे. केंद्र सरकारची विविध क्षेत्रांतील धोरणे कामगारविरोधी आहेत, असा आरोप या संघटनांनी केला आहे.
18 ऑगस्ट रोजी कोळसा कामगार आंदोलन करणार आहेत. अंगणवाडी, आशा, मध्यान्ह भोजन क्षेत्रातील कामगारांनी सात व आठ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रातील कामगार संघटनाही आंदोलन करणार असून आंदोलनाची वेळ लवकरच ठरविण्यात येईल.