लग्नानंतर महिलांना परपुरुषांबद्दल का वाटते आकर्षण?

लग्न हे प्रेम आणि विश्वासाचे अतूट बंधन असतं. पण सध्याच्या काळात अनेक लोक लग्न झाल्यानंतरदेखील बाहेर प्रेमसंबंध ठेवत असतात. यामध्ये फक्त पुरुषच नाहीतर महिलांचादेखील समावेश असतो. हे विवाहबाह्य संबंध कोणत्याही वैवाहिक जीवनाला उध्वस्त करू शकतात. नवरा बायकोच्या नात्यात तिसरा कोणतरी येणे हे एखाद्या वादळापेक्षा कमी नाही. विवाहबाह्य संबंधांचा मुलांवरही वाईट परिणाम होतो. पण लग्नानंतर बायका दुसऱ्या पुरूषांच्या प्रेमात का पडतात? यामागे काही कारणं आहेत त्याबाबद्दल जाणून घेऊयात…
1) भावनिक आधार :
लग्न झालेल्या एखाद्या महिलेला तिच्या पतीकडून भावनिक आधार मिळाला नाही तर ती तो भावनिक आधार बाहेर शोधण्याचा प्रयत्न करते. यानंतर ती परपुरुषाकडे आकर्षित होते.
2) वेळेचा अभाव
लग्न झाल्यानंतर काही वर्ष चांगली गेली कि पुरुष घराच्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जातो. तो इतका गुंतून जातो कि तो आपल्या बायकोला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ती महिला दुसऱ्या पुरूषांकडे आकर्षित होते.
3) समाधानाचा अभाव
40 वर्षानंतर महिलांच्या बाबतीत विवाहबाह्य संबंधांचं एक कारण शारीरिक समाधानाचा अभाव असू शकतो. नवऱ्याकडून शारीरिक सुख न मिळाल्याने महिला दुसऱ्या पुरूषाकडे आकर्षित होऊ शकते.
4) रोजाची भांडणं
घरातील रोजच्या भांडणामुळे नवरा बायकोच्या नात्यातील प्रेम कमी होते आणि त्यामुळे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. अनेक वेळा घरगुती समस्यांमुळे महिला टेन्शनमध्ये असतात. त्यामुळे या टेन्शनमधून बाहेर पडण्यासाठी त्या बाहेर प्रेम शोधू लागतात.





