Sushma Andhare : आज रविवार असल्याने प्रचाराचा सुपर संडे असल्याचे बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे २ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार मोहिम राबवली जात आहे. महायुती म्हणून राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात मैदानात उभे ठाकले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. अशातच महाविकास आघाडीचे नेते कुठे प्रचार करताना दिसत नसल्याची चर्चा सुरू झाली असून, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. याविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे आणि फडणवीस धावपळ करत आहेत. मग महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत? असा सवाल विचारला जात आहे. पण उद्धव ठाकरे पक्षाच्या विचार केला असता त्या त्या आमदारांवर त्यांच्या भागातील नगरपरिषदांची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती सुषमा अंधारेंनी दिली. शिंदे फडणवीसांकडे आयात केलेले अत्यंत नवखे लोक आहेत त्यामुळे नियोजनासाठी त्यांना स्वतः मैदानावर उतरावे लागत आहे. फडणवीसांचा प्रॉब्लेम अजून वेगळा आहे की तिथे जुने विरुद्ध नव्हे असा संघर्ष असल्यामुळे जुने नाराज आहेत आणि नव्यांना काम जमत नाही. ठाकरेंकडे असणारे मात्र निष्ठावंत… pic.twitter.com/5tG67Hefxy — SushmaTai Andhare (@andharesushama) November 29, 2025 फडणवीस, शिंदेंवर गंभीर आरोप ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने संबंधित भागांतील पक्षाच्या नेत्यांना स्थानिकचे राजकारण चांगल्या पद्धतीने माहित असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पण असं शिंदेंना फडणवीसांना करता येत नाही; शिंदेंकडे आयात करण्याचा कार्यक्रम चालू आहे, फडणवीस यांनी स्वतःच्याच पक्षातील नेते असे काही संपवले आहेत की जुने विरुद्ध नवे असा संघर्ष भाजपमध्ये पाहायला मिळत आहे, असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. यामुळे नाराजांना नाराज होऊन काम करत येत नाही, तर नव्यांना कामच करता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप, शिवसेना काय प्रत्युत्तर देणार? पुढे त्या म्हणाल्या, अशा परिस्थितीमध्ये जिथे ठाकरे हा नेता घडवणारा ब्रँन्ड आहे, तिथे फडणवीस हा नेते फोडणारा इतर ठिकाणचे नेते चोरणारा पक्ष म्हणून नावारुपाला आणण्याची वल्ली आहे, हा फरक असल्यामुळे ती धावपळ फडणवीसांना करावी लागते, ठाकरेंना नाही, अशी शब्दांत टीकाही सुषमा अंधारेंनी केली. यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला भाजप आणि शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : “आता फक्त माझं राजकारणच नाही तर…”; धनंजय मुडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, रोख कुणाकडे?