Sanjay Raut : लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील अत्यंत महत्वाचे नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाले. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या विधेयकांच्या अडून सरकार मतदारसंघ पुर्नरचना करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरुन एकमेकांवर टीका केली जात आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल वैगरे म्हणताय आता ते मुळात महिला आरक्षणाचे विधेयक नव्हते. ते मतदारसंघ तोडण्याचे एक बिल होते.” असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानंतर त्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटण्याची शक्यता आहे. भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष असणार आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? (Sanjay Raut) संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा नारी शक्ती विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. जे लोक संवैधानिक पदावर बसली आहेत, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री ज्यांनी संविधआनाची शपथ घेऊन खरं बोलण्याची एक शपथ घेतली आहे. की आम्ही खरं बोलून जनतेला, देशाला फसवणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श न पाळता, महाराष्ट्राच्या जनतेला काहीही खोटं सांगू, खोटं बोलू नये. ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल वैगरे म्हणताय आता ते मुळात महिला आरक्षणाचे विधेयक नव्हते. ते मतदारसंघ तोडण्याचे एक बिल होते, असे संजय राऊत म्हणाले. फडणवीसांवर टीका (Sanjay Raut) Sanjay Raut : “ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल म्हणताय ते मुळात…”; संजय राऊतांचा मोठा दावा संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका ट्वीटची आठवण करून देत त्यांना याबाबत काही सवाल विचारले आहेत. साधारण 20 सप्टेंबर 2023 ला त्यांनी (देवेंद्र फडवणवीसांनी) एक एक ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात की, ऐतिहासिक क्षण, लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने परवानगी दिली. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. यामुळे महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण मिळेल. मग 20 सप्टेंबर 2023 ला ट्वीट करण्याचे कारण काय, याचे कारण हे बिल मंजूर झालेले आहे. आता तीन वर्षांनी कसली भ्रूण हत्या झाली. महाराष्ट्रात भ्रूण हत्येवर बंदी आहे, हे ते विसरले का, 2023 ला जे बिल मंजूर झालं, त्या बिलासंदर्भात तुम्ही आता आमचा निषेध करताय, अशा शब्दांत राऊतांनी फडवीसांवर टीका करत सवाल विचारले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांनी 2023 च्या ट्वीटबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे. हेही वाचा : Jammu and kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात! उधमपूरमध्ये बस उलटून ७ प्रवाशांचा मृत्यू